शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 19:31 IST

भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या.

राजू काळेभार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. त्यामुळे तूर्तास त्या सुरक्षित असून किना-यावरील मासळी सुकविण्याच्या जागेतील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान झाल्याचे पाली मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.बोटींना समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्यानुसार मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी देखील पश्चिम किनारपट्टीवरील शहराच्या हद्दीतील भाटेबंदर ते पाली दरम्यानच्या मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. पालिकेसह जिल्हाप्रशासन व उत्तन-सागरी पोलिसांनी किना-याचा ताबा घेत समुद्रात जाणा-यांना रोखले. दर १५ मिनिटांनी वादळाचा वेध घेत किना-यावरील मच्छीमारांना जागरुक राहण्यासाठी त्याची माहिती दिली जात होती.दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत किना-यावरील सर्व बोटी किना-यावरील जेट्टींलगत सुरक्षितपणे नांगरण्यात आल्या. मंगळवारी मध्यरात्री समुद्रातील मोठ्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र त्यात किना-यावरील काही साहित्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे डिमेलो यांनी सांगितले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसांपासुन किना-यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देणे सुरु होते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी वेळेतच किना-यावर नांगरण्यात आल्या. तरीदेखील पोलिसांची किना-यावर गस्त सुरु असुन वादळाचा आढावा सतत घेतला जात आहे. ओखी वादळामुळे शहरात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली. ती मंगळवारीही कायम होती.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरOckhi Cycloneओखी चक्रीवादळ