शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात प्रवाशांसाठी धोक्याची घंटा, खचलेला रस्ता, डोकावणाऱ्या दरडीमुळे धोका कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:32 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता.

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे, त्या पाठोपाठ मागील वर्षी एक किलोमीटर चा दोन ठिकाणी खचलेला कसारा घाटातील रस्ता आज ही जैसा थे आहे तर दोन्ही घाटातील दरडी डोकावत असल्याने त्या पडायच्या स्थितीत आहे ,त्या मुळे या वर्षी देखील या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा कायम आहे, एकीकडे कोरोनाच्या प्रादूरभावाणे सर्वत्र धुमाकूळ घातला असताना राष्ट्रीय महामार्गावरील  भिवंडी ते गोंन्दे या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आपघाताचे प्रमाणही वाढले आहे.  एक वर्षापासून दुरवस्थेत असलेल्या या महामार्गावर टोलवसुली कायम असून सद्या मुंबई नाशिक महामार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता. या धोकादायक रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने १० महिन्यात १५ वेळा पाहणी करून सर्व्हे केला तर या महामार्गाचा ठेका घेतलेल्या पीक इन्फ्रा कंपनीने तर अनेकदा पहाणी केली. परंतु, १० महिन्यात कसारा घाटासह, भिवंडी वडपा ते गोंदे या दरम्यान दुरावस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची काडीमात्र दुरुस्ती न करता प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवत  महामार्गावर टोल वसुली नियमितपणे सुरू ठेवली. पीक इन्फ्रा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे भिवंडी ते गोंदे दरम्यान वर्षभरात १७० दुचाकी तर, ५० हुन अधिक मोठया वाहनाचा आपघात झाला असून १७ बळी गेले आहेत. तर अनेकजण जखमी झाले, काहींना अपंगत्व आले. या रस्त्यावरील अनेक त्रुटी या अपघातांना कारणीभूत ठरत असून यंदाच्या पावसाळ्यात प्रवासी व नागरिकांमध्ये भिती कायम आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसMumbaiमुंबई