शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कसारा घाटात प्रवाशांसाठी धोक्याची घंटा, खचलेला रस्ता, डोकावणाऱ्या दरडीमुळे धोका कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:32 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता.

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे, त्या पाठोपाठ मागील वर्षी एक किलोमीटर चा दोन ठिकाणी खचलेला कसारा घाटातील रस्ता आज ही जैसा थे आहे तर दोन्ही घाटातील दरडी डोकावत असल्याने त्या पडायच्या स्थितीत आहे ,त्या मुळे या वर्षी देखील या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा कायम आहे, एकीकडे कोरोनाच्या प्रादूरभावाणे सर्वत्र धुमाकूळ घातला असताना राष्ट्रीय महामार्गावरील  भिवंडी ते गोंन्दे या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आपघाताचे प्रमाणही वाढले आहे.  एक वर्षापासून दुरवस्थेत असलेल्या या महामार्गावर टोलवसुली कायम असून सद्या मुंबई नाशिक महामार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता. या धोकादायक रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने १० महिन्यात १५ वेळा पाहणी करून सर्व्हे केला तर या महामार्गाचा ठेका घेतलेल्या पीक इन्फ्रा कंपनीने तर अनेकदा पहाणी केली. परंतु, १० महिन्यात कसारा घाटासह, भिवंडी वडपा ते गोंदे या दरम्यान दुरावस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची काडीमात्र दुरुस्ती न करता प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवत  महामार्गावर टोल वसुली नियमितपणे सुरू ठेवली. पीक इन्फ्रा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे भिवंडी ते गोंदे दरम्यान वर्षभरात १७० दुचाकी तर, ५० हुन अधिक मोठया वाहनाचा आपघात झाला असून १७ बळी गेले आहेत. तर अनेकजण जखमी झाले, काहींना अपंगत्व आले. या रस्त्यावरील अनेक त्रुटी या अपघातांना कारणीभूत ठरत असून यंदाच्या पावसाळ्यात प्रवासी व नागरिकांमध्ये भिती कायम आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसMumbaiमुंबई