शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शेतीची कामे संपली, शेकडो नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 05:24 IST

शेतीची कामे संपली : चरितार्थासाठी वीटभट्टी, शेतावर, हॉटेलमध्ये जाण्यास सुरुवात

मुरबाड : पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांकडे काही काम नसल्याने तसेच शासनाच्या विविध विभागांची कामे सुरू न झाल्याने रोजगारासाठी शेकडो ग्रामस्थ, आदिवासी तसेच शेतमजूर कुटुंबांसह स्थलांतर करू लागले आहेत. ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतीची कामे असतात. त्यानंतर, भातकापणी आणि झोडणी अशी कामे असतात. परंतु, दिवाळी झाल्यानंतर काहीच काम नसल्याने ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी हे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आळेफाटा, जुन्नर, पुणे, ओतूर, बेल्हे, घोडेगाव, नाशिक, मंचर, नगर आदी ठिकाणी कांदा, भाजीपाला लागवड करण्यासाठी तसेच हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी जातात. रोज सकाळी टोकावडे, मोरोशी, सावर्णे, धसई येथून हे आदिवासी, शेतमजूर जीप, ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनांतून धोकादायक परिस्थितीत प्रवास करून जातात.

मजुरांना मागेल ते काम मिळावे, म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये मजुरांनी काम मागायचे असते. त्याप्रमाणे शासनाचे विविध विभाग मनरेगाअंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करते. या प्रक्रियेत काही ना काही वेळजातोच.मात्र, एवढा वेळ ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी थांबू शकत नाहीत. किंबहुना, तेवढे दिवस रोजगार तसेच आर्थिक पाठबळ नसल्याने आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवू शकत नाही. पर्यायाने नाइलाजास्तव पावसाळा संपल्यावर हे मजूर लगेच रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. मनरेगाची कामेही काही ठेकेदार यांत्रिक पद्धतीने करताना दिसतात. त्यामुळेही मजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी, बांधकाम, पाटबंधारे आणि वनविभागाने पावसाळा जाऊन एक महिना लोटला, तरी कामे सुरू झाली नसल्याने हे ग्रामस्थ, शेतमजूर, आदिवासी कुटुंबाच्या चरितार्थासाठी कामाच्या शोधात वीटभट्टी, शेतावर तसेच हॉटेलमध्ये कामासाठी स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे लोकांची रोजगाराची सोय होणार आहे.मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीररोजगारासाठी शेकडो आदिवासी, शेतमजूर, ग्रामस्थ स्थलांतरित होत असल्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसतो. शेतावर किंवा वीटभट्टीवर काम करणाºया मजुरांना मुले शाळेत कुठे टाकायची व त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न या मजुरांना पडतो.आदिवासी, शेतमजुरांचे आरोग्य धोक्यातस्थलांतरित झालेले आदिवासी, शेतमजूर हे कामाच्या ठिकाणीच राहत असल्याने त्यांच्यासोबतच्या लहान मुलांच्या आरोग्याबाबतच्या समस्या तशाच राहतात. त्यांना आरोग्यसुविधा वेळेवर मिळत नसल्याने विविध प्रकारचे आजार जडत आहेत.मजुरांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्याकडे कामाची मागणी केल्यास आम्ही त्वरित काम देऊ.- दोडके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड 

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरी