शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

शेतीची कामे संपली, शेकडो नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 05:24 IST

शेतीची कामे संपली : चरितार्थासाठी वीटभट्टी, शेतावर, हॉटेलमध्ये जाण्यास सुरुवात

मुरबाड : पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांकडे काही काम नसल्याने तसेच शासनाच्या विविध विभागांची कामे सुरू न झाल्याने रोजगारासाठी शेकडो ग्रामस्थ, आदिवासी तसेच शेतमजूर कुटुंबांसह स्थलांतर करू लागले आहेत. ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतीची कामे असतात. त्यानंतर, भातकापणी आणि झोडणी अशी कामे असतात. परंतु, दिवाळी झाल्यानंतर काहीच काम नसल्याने ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी हे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आळेफाटा, जुन्नर, पुणे, ओतूर, बेल्हे, घोडेगाव, नाशिक, मंचर, नगर आदी ठिकाणी कांदा, भाजीपाला लागवड करण्यासाठी तसेच हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी जातात. रोज सकाळी टोकावडे, मोरोशी, सावर्णे, धसई येथून हे आदिवासी, शेतमजूर जीप, ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनांतून धोकादायक परिस्थितीत प्रवास करून जातात.

मजुरांना मागेल ते काम मिळावे, म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये मजुरांनी काम मागायचे असते. त्याप्रमाणे शासनाचे विविध विभाग मनरेगाअंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करते. या प्रक्रियेत काही ना काही वेळजातोच.मात्र, एवढा वेळ ग्रामस्थ, शेतमजूर तसेच आदिवासी थांबू शकत नाहीत. किंबहुना, तेवढे दिवस रोजगार तसेच आर्थिक पाठबळ नसल्याने आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवू शकत नाही. पर्यायाने नाइलाजास्तव पावसाळा संपल्यावर हे मजूर लगेच रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. मनरेगाची कामेही काही ठेकेदार यांत्रिक पद्धतीने करताना दिसतात. त्यामुळेही मजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी, बांधकाम, पाटबंधारे आणि वनविभागाने पावसाळा जाऊन एक महिना लोटला, तरी कामे सुरू झाली नसल्याने हे ग्रामस्थ, शेतमजूर, आदिवासी कुटुंबाच्या चरितार्थासाठी कामाच्या शोधात वीटभट्टी, शेतावर तसेच हॉटेलमध्ये कामासाठी स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे लोकांची रोजगाराची सोय होणार आहे.मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीररोजगारासाठी शेकडो आदिवासी, शेतमजूर, ग्रामस्थ स्थलांतरित होत असल्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसतो. शेतावर किंवा वीटभट्टीवर काम करणाºया मजुरांना मुले शाळेत कुठे टाकायची व त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न या मजुरांना पडतो.आदिवासी, शेतमजुरांचे आरोग्य धोक्यातस्थलांतरित झालेले आदिवासी, शेतमजूर हे कामाच्या ठिकाणीच राहत असल्याने त्यांच्यासोबतच्या लहान मुलांच्या आरोग्याबाबतच्या समस्या तशाच राहतात. त्यांना आरोग्यसुविधा वेळेवर मिळत नसल्याने विविध प्रकारचे आजार जडत आहेत.मजुरांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्याकडे कामाची मागणी केल्यास आम्ही त्वरित काम देऊ.- दोडके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड 

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरी