शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आंदोलक संगणक चालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर; पालिकेकडून पुनर्नियुक्तीसाठी परीक्षेचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:44 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा पुनर्नियुक्तींचा मार्ग सध्या खडतर झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचे ठरल्यास परीक्षेचा फंडा अंमलात आणण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पालिकेने कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ८७ संगणक चालक व ४ लघुलेखकाला २८ जुलै २००७ रोजी ठोक मानधनावर ५ महिन्यांकरिता सामावून घेतले. त्यांना तत्कालीन महासभा व स्थायी समितीने सतत मुदतवाढ दिल्याने प्रशासनाने त्यांच्या सेवेत १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांची नियुक्ती कायम ठेवली. गेल्या १० वर्षांपासून ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी दरम्यानच्या काळात २० संगणक चालक व ३ लघुलेखकांनी ठोक मानधनावरील नोकरी सोडली.उर्वरित ६७ संगणक चालक व १ लघुलेखकाने सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. परंतु प्रशासनाने त्याला सतत खो घातला. अखेर ४ जानेवारी २०१७ रोजी त्यांची मुदतवाढ संपुष्टात येत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी १९ मे २०१७ रोजीच्या महासभेत सर्वपक्षीयांनी त्या कर्मचाऱ्यांना लिपिक व टंकलेखक वर्ग ३ अनुसार त्यांच्या शिक्षणाची अट शिथिल करून त्यांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला. परंतु या ठरावासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ५३ (३) नुसार स्थायी समितीची पूर्वपरवानगी अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करून ६ जानेवारी २०१७ पासून त्या कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांकरिता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २०१७ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत सादर केला. त्यावर स्थायीने कोणताही ठोस निर्णय न घेता तो विषय येत्या महासभेत पुढील निर्णयासाठी सादर केला जावा, असा ठराव संमत केला. तत्पूर्वी प्रशासनाने २६ जुलै २००६ रोजी संगणक चालक व लघुलेखक यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्याला राज्य सरकारने अमान्य केल्यानेच १९ मे २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेला ठराव पालिका अधिनियमातील तरतुदीशी विसंगत असल्याचा दावा करीत तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले. मात्र प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत त्या कर्मचा-यांनी २२ जानेवारीपासून श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी आंदोलन मागे घेऊन कामावर त्वरित हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले. परंतु कर्मचारी सेवेत कायम करण्याच्या मुद्द्यावर अडून बसल्याने प्रशासनाने त्यांची सेवाच खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पुन्हा मानधनावर सेवेत घ्यायचे झाल्यास संगणक संबंधित परीक्षा त्यांना अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर