शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जिल्ह्यातील शाळा बंदच्या विरोधात प्रशासना विरूध्द समाजिक संघटनांचा संघर्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 23:00 IST

जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३११ प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे ३११ प्राथमिक शाळा बंद करण्याची कारवाई ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून होत आहे. या निर्णया विरोधात श्रमजीवी संघटना व श्रमिक मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्षाच्या प्रयत्नात आहेत. शाळा बंदच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेचा निषेधही या संघटनांनी केला आहे.‘ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वा-यावर ’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्तप्रसिध्द केले असता त्याची दखल घेत समाजिक संघटनांनी प्रशासना विरोधात संघर्षाचा इशारा दिला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आता शिक्षणाची वाट धरली असून त्यात त्यांच्या शाळा बंद करण्याचा जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय हा ‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याची पायमल्ली करणार असल्याची जाणीव श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांना करून दिली आहे.जिल्ह्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन अंबरनाथ तालुक्यातील सुमारे तीन शाळा शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी स्वत: जावून बंद केल्या आहेत . या विद्यार्थ्याची शालेय व्यवस्था न करता, वाहन सुविधा विचारात न घेता त्याना वा-यावर सोडून दिले. तेथील शिक्षक पंचायत समितीवर बसवून ठेवले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे ३११ शाळा बंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाही शिक्षणाधिकारी केवळ दहा शाळा बंदची पत्रकारांना खोटी माहिती देऊन राजकारण्यांपेक्षाही जास्त भूलथापा मारण्याचा त्यांचा हात अंखड आनोखा ठरल्याचे उघउ झाले आहे.जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचा मान मिळवणा-या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे सुमारे ३११ बंद होण्याचे गावखेड्यांवर संकट ओढावले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काही गावातील महिला व पुरूषांनी सोमवारी गटविकास अधिका-यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर सामाजिक संघटनांनी दंड थोपटून जि.प.च्या निर्णयाचा निषेधही नोंदवला आहे. जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळा बंद करण्याविरोधात श्रमजीवी संघटनेसे श्रमिकमुक्ती संघटना प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी लेखी निवेदन देऊन इशाराही दिलां आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे