शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पुन्हा राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पुसली पाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 19:43 IST

शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

भिवंडी : शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षापासून मेट्रो रेल्वे भिवंडीत येणार असे सांगत राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले असुन विकासकांसाठी ही रेल्वे शहराबाहेर वळविल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मंत्री भाऊसाहेब वर्तक व खासदार भाऊसाहेब धामणकर यांनी ठाणे ते डहाणू रेल्वे भिवंडी शहरातून नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता.परंतू केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला गती मिळाली नाही.त्यानंतर शहरातील कापड उद्योगाला गती मिळावी या करीता दिवा-वसईरोड दरम्यान भिवंडी रोड रेल्वेस्थानक सुरू करून या रेल्वेमार्गावर प्रवासी वहातूकीपेक्षा मालगाडी वहातूकीस जास्त प्राधान्य देण्यात आले.देशांमधील प्रत्येक राज्यातून आलेला व्यक्ती शहरात कापड व्यावसायीक अथवा कामगार म्हणून काम करीत आहे.गेल्या काही वर्षापासून येथील ग्रामिण भागात झालेल्या गोदामांत देखील मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे.असे असताना त्यांच्या प्रवासी सेवेसाठी राज्यकर्ते नेहमी उदासीन असल्याचे दिसुन आले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ ही रेल्वे कापुरबावडी-अंजूरफाटा ते गोपाळनगर नंतर पुढे कल्याण येथे जाणार होती.आता ही रेल्वे अंजूरफाटा येथुन ओसवालवाडी ताडालीमार्गे गणेशनगर-टेमघर अशी मुळ शहराबाहेरून पुढे कल्याण येथे जाणार असल्याने शहरातील लोकांना त्याचा फारसा काही उपयोग न होता त्यांच्या भिवंडीकरांच्या नशीबी सध्या असलेला त्रास कायम रहाणार आहे.पुर्वी भिवंडीरोड रेल्वेसाठी अंजूरफाटा गाठावा लागायचा आता मेट्रोसाठी तेथे जावे लागणार आहे.त्या ऐवजी अनेकांना सध्या सुरू असलेल्या खाजगी व सार्वजनिक प्रवासी सेवा उपयुक्त ठरणार आहे.म्हणजेच भिवंडीकरांना ही मेट्रो उपयुक्त न ठरता पुन्हा वहातूक कोंडीतून जावे लागणार आहे.गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक राजकारण्यांनी धामणकरनाका,गोपाळनगर पर्यंत मेट्रो येऊन नागरिकांची वहातूक कोंडीपासून सुटका झाल्याच्या वावड्या उठविल्या होत्या त्याला मेट्रोच्या नवीन जाहिर झालेल्या मार्गाने पुर्णविराम मिळाला असुन राजकारण्यांचा खरा चेहरा नागरिकांसमोर आला आहे. 

टॅग्स :Metroमेट्रो