शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 13:53 IST

दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते.

ठाणे - दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पूल आणि रस्त्यांवरील पूल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारण्याऐवजी चालणाऱ्या प्रवाशांना दोष देत आहेत.असा निर्लज्जपणा आणि मग्रुरी प्रथमच अनुभवायला मिळत आहे. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे गरजेचे आहे. मात्र, तेच केले जात नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर प्रथम बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार असून, जाहीरनाम्यामध्येही तसे नमूद करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, सीएसटी पुल दुर्घटनेतील मृतांना 25 लाख आणि जखमींना 15 लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशीही मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.गेल्या 5 वर्षांत रेल्वे प्रवाशांची आणि रेल्वेसेवेची दुर्दशा झाली आहे. कर्जत-कसारा ते सीएसटी; पनवेल ते सीएसटी आणि विरार ते चर्चगेट असा प्रवास करणारे चाकरमानी जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये तीन पूल कोसळले. पण त्याचे या राजकीय व्यवस्थेला कसलेही सोयरसुतक नाही. हा अपघात प्रवाशांच्या चुकीमुळे झाला असल्याचा दावा हे लोक करीत आहेत. यावरून त्यांच्यातील मग्रुरीच दिसून येत आहे. रेल्वेच्या सुधारणा करण्याऐवजी प्रवाशांनाच दोष देण्याची ही कृती अत्यंत असंवेदनशील आणि बेशरमपणाची आहे.मुंबई ठाण्यातील रेल्वेचे पूल, रेल्वेशी संलग्न असलेले पूल, रस्त्यांवरील पूल यांना आता जवळपास 50 ते 70 वर्षे झालेले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामध्ये टिळक पूल असो किंवा कोपरीचा पूल! कोपरीचा पूल तर अत्यंत जर्जर झालेला असून रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना 5 नोव्हेंबर 2015 रोजी पत्र लिहून या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.या पत्राला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. लोकांचे जीव जाण्याचे वाट हे सरकार पाहत आहे का? गरीबांचा जीव हा जीव नसतो का? धोकादायक फलक लावण्याचेही औदार्यही दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वे, रेल्वेशी संलग्न आणि रस्त्यावरील सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढावी; सकाळी आणि सायंकाळी रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करावे, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.दरम्यान, एकीकडे दररोज दोनशे अपघात होत आहेत. या दुर्घटनांमध्ये लोक मारले जात असताना जगाच्या बाजारात हा देश विकण्यासाठी हे सरकार बुलेट ट्रेन आणू पाहत आहे. हा प्रकल्प मुंबई, ठाणे-पालघरवासीयांच्या काही कामाचा नसतानाही तो लादला जात आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा आणि त्यासाठी वापरण्यात येणारा निधी मुंबई प्रांतीय रेल्वे सुधारणेसाठी वापरावा, अशी मागणी करुन आमचे सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन तत्काळ रद्द करून तो निधी ठाणे, मुंबई रेल्वेसेवा आणि रेल्वेशी संलग्न असलेल्या सेवांसाठी वापरण्यात येईल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना