शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना मिळाले केवळ एक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:43 AM

नगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत.

- लिओ कोलासोनगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत. पूर्वीच्या निवडणुकांचा काळ कसा होता, हे सांगताना वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केलेल्या कोलासो यांच्यात एक वेगळाच उत्साह जाणवला.उत्तन म्हणजे पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला. त्याकाळी गावातील लोकांना दुसरा पक्षच चालत नव्हता. मी चौथीमध्ये शिकत असताना मामा सरपंच होते. निवडणूक काळात शाळा सुटली की, मामा मतदार यादी लिहून काढायला सांगत. झेरॉक्स नसल्याने त्याच्या प्रती तयार करायला कार्बन पेपर वापरला जायचा. हात काळे व्हायचे. यादी बनवून आणि वाटून झाली की, चहा आणि खाजा मिळायचा.सध्याचा उत्तननाका व देना बँक येथील चौकात निवडणुकीच्या प्रचार सभा व्हायच्या. अनेक राजकीय सभा येथे झाल्या. गावातील गल्लीबोळांतून प्रचाराची मोठी रॅली घोषणा देत निघायची.कार्यकर्त्यांमध्ये जसा उत्साह असायचा, तसाच उत्साह मतदारांमध्ये पण असायचा. सभेतील भाषणं ऐकायला लहानांपासून मोठे सर्व झाडून यायचे. आतासारखी भाड्याची माणसं व कार्यकर्त्यांची गर्दी जमवावी लागायची नाही. मतदानाच्या दिवशी चहापाण्याचा खर्च काय व्हायचा तोच.त्याकाळी कृष्णा मेनन हे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून निवडून यायचे. ते देशाचे संरक्षणमंत्री होते. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ते काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून उभे राहिले होते. स.गो. बर्वे यांची बहीण ताराताई सप्रे काँग्रेसच्या उमेदवार होत्या. उत्तन गावातून मेनन यांना फक्त एकच मत मिळालं होतं. ते मत कोणाचं होतं, हे अख्ख्या गावाला कळलं होतं.भारत सरकारची त्याकाळी आकाशवाणी योजना होती. ग्रामपंचायत कार्यालयात रेडिओ सेट द्यायचे. गावात त्या रेडिओला मोठा भोंगा लावायचे. त्याचे लोकांना खूप कुतूहल होते. तीच एक करमणूक असायची. सकाळपासून दुपारपर्यंत आणि पुन्हा सायंकाळी गाणी आदी लागायचे. बातम्या असायच्या. निवडणुकीच्या काळात तर रेडिओवरच्या बातम्या ऐकण्यासाठी मुख्य चौकात गर्दी जमायची.एका निवडणुकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले उत्तन येथे प्रचारसभेसाठी येणार होते. गावातला रस्ता खराब. नवघरचे मोरेश्वर पाटील हे बांधकाम समिती सभापती होते. मग काय, रातोरात त्यांनी धावाधाव करून रस्ता ठीकठाक करण्यासाठी दगडखडी टाकून घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या गाड्या आल्या, त्यावेळी रस्त्यासाठी टाकलेल्या त्या दगडखडीचा उडालेला धुरळा आजही आठवतो.अधिकाऱ्यांना मेजवाणीगावात एकच हॉटेल होतं. निवडणुकीसाठी अधिकारी यायचे. मग, ग्रामस्थ मोठ्या आपुलकीने जेवणाची सोय करायचे. माशाचे कालवण, भाकऱ्या, सुक्या बोंबलाची चटणी असे कोळी पद्धतीचे जेवण म्हणजे आठवणीत राहणारी मेजवानीच असायची.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक