शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मृत्यूनंतर त्या मृताचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 20:36 IST

कुटुंबातील १६ जणांना पालिकेने केले क्वारंटाईन ... 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना रिपोर्ट नसल्याने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने उपचारांअभावी मृत्यू झालेल्या त्या मृताचा रिपोर्ट अखेर पॉझिटिव्ह आला असून त्याच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता पुढचे सोपस्कार पाळण्यासाठी ठाणे महापालिकेने  त्याच्या कुटुंबातील १६ जणांना क्वारंटाईन केले आहे. एखाद्या रुग्णाची ताब्यात अचानक बिघडल्यास रिपोर्ट येईपर्यंत हॉस्पिटल कोरोना रिपोर्ट शिवाय दाखलच करून घेत नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. 

        घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रास  सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जोर्पयत अहवाल येत नाही, तोर्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे .त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर  रिक्षावाला घेऊन जाण्यास तयार झाला होता. जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली होती . परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर  जिल्हा शासकीय रुग्णालयात  जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला. 

        या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. तर पत्नी देखील पॉझिटिव्ह आली असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना मात्र क्वारंटाईन करण्याचे सोपस्कार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.  रुग्ण कोणत्याही रुग्णालयात गेल्यास त्यावर आधी उपचार करा असे पालिका प्रशासनाचे आदेश असताना या आदेशाची अंमलबजावणी मात्र कोणत्याही हॉस्पिटलकडून होत नसल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस