शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

अंबरनाथमधील आशिष जाधवच्या मृत्यूनंतर शहरभर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 18:54 IST

बियर पिल्यावर घरी परतलेल्या आशिष जाधव या तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्रकरणानंतर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली होती.

ठळक मुद्देआशिष जाधव दारू पिऊन घरी परतल्यावर झाला त्रास उपचार सुरु हायेण्या आधीच त्याचा झाला मृत्यू दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली

अंबरनाथ - रविवारी मित्रंसोबत बसुन बियर पिल्यावर घरी परतलेल्या एका तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याला हा त्रस असाह्य झाला. छातीत प्रचंड दुखत असल्याने त्याला त्याच्या मित्रंनी एका खाजगी रुग्णालयात उपरासाठी दाखल केले. तेथे त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्रकरणानंतर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली होती. मात्र या तरुणाचा मृत्यू काशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.     आशिष जाधव आणि गणोश जाधव हे दोघे मित्र आपल्या इतर मित्रंसोबत रात्री एकत्रित दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पार्टी जाल्यावर हे पुन्हा आपल्या घरी सर्वाेदय नगर येथे जात असतांना पोलीसांनी त्यांना हटकले. त्यांच्यावर यावेळी दंडात्मक कारवाई केल्यावर पोलीसांनी त्यांना सोडुन दिले. मात्र घरी परतल्यावर आशिष याच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली. त्याने हा त्रस घरी सांगितले. तसेच छातीला बाम लावुन त्याने रात्रभर झोप काढली. मात्र सकाळी उठल्यावर पुन्हा त्याला छातीत दुखण्याचा त्रस जाणवत होता. आशिषला रुग्णालयात नेण्यासाठी त्याचा मित्र गणोश आला. त्याने त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभिर असल्याने त्याला अंबरनाथच्या ह्दयरोग तज्ञाकडे हलविण्यात आले. मात्र तेथे नेल्यावर आशिषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आशिषचा मृत्यूमागचे नेमके कारण हे त्याच्या शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र आशिषचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्यासोबत असलेला मित्र गणोश जाधव याला मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्याची प्रकृती देखील बिघडली होती. त्याला देखील प्राथमिक उपचार करुन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय त हलविण्यात आले आहे.     दरम्यान आशिष याच्या मृत्यृचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शहरभर दारुतुन विषबाधा झाल्याची चर्चा रंगली. एकाचा मृत्यू तर इतर अनेकजणांना त्रस झाल्याच्या चर्चा सुरु होती. मात्र वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण वाघ यांनी असा कोणताच प्रकार घडलेला नाही असे स्पष्ट केले आहे. तर आशिषच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी त्याचे शवविच्छेदन हे जे.जे.रुग्णालय त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.  

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDeathमृत्यूPoliceपोलिस