शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 समितीची पाठ फिरताच डोंबिवलीत फेरीवाले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 4:20 PM

शनिवारी केंद्र स्तरावरील स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ यासंदर्भात कल्याण-डोंबिवली शहरांची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक पाहणीसाठी आले होते. महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनूसार चार दिवस ते पथक महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. शनिवारी ते पथक डोंबिवलीत येणार म्हणुन स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, तर शहरभर डीडीटी पावडरीच्या रांगोळया काढल्या होत्या. सोमवारी मात्र त्या समितीची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाली असून फेरीवाल्यांनी त्यांची पथारी पसरली होती.

ठळक मुद्दे मनसेची अवमान याचिकेबाबत पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय  सत्ताधारी युवासेनेचे पदाधिकारी म्हणतात करणार आंदोलन

डोंबिवली: शनिवारी केंद्र स्तरावरील स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ यासंदर्भात कल्याण-डोंबिवली शहरांची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक पाहणीसाठी आले होते. महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनूसार चार दिवस ते पथक महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. शनिवारी ते पथक डोंबिवलीत येणार म्हणुन स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, तर शहरभर डीडीटी पावडरीच्या रांगोळया काढल्या होत्या. सोमवारी मात्र त्या समितीची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाली असून फेरीवाल्यांनी त्यांची पथारी पसरली होती.त्यामुळे रविवारी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये डीडीटीच्या रांगोळया, फेरीवाल्यांना सक्तीची रजा या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते ते योग्य असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सोशल मीडियावरही नागरिकांनी स्पष्टपणे मत मांडली. डोंबिवलीत पूर्वेला रेल्वे स्थानकालगत राथ रोड, एस.व्ही रोड, चिमणी गल्ली, नेहरु रोड, पाटकर रोड आदी सर्व ठिकाणी फेरीवाल्यांनी रविवार रात्रीपासूनच ठाण मांडले होते. सोमवारचा आठवडा कपड्यांचा बाजारदेखिल सकाळच्या वेळेत लागला होता. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकासह अधिका-यांच्या दुटप्पी धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली.सोशल मीडियावर युवासेनेचे जिल्हाधिकारी, नगसेवक दिपेश म्हात्रे यांनीही युवासेना फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणार असे पुन्हा सांगितले. त्यावर काहींनी सत्ताधारी असूनही आंदोलन करावी लागतात, प्रशासनावर सत्ताधा-यांचा अंकुश नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली. तर त्यावर अवमान याचिकेचा, सवंग प्रसिद्धीचा विषय आल्यावर मात्र लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली. मनसेचे नेते, सरचिटणीस राजू पाटील यांनी आंदोलन आयुक्तांविरोधात करणार असाल तर मनसे निश्चितच सहकार्य करेल असा पवित्रा व्यक्त केला.अवमान याचिके संदर्भात विरोधी पक्षेनेते मंदार हळबे म्हणाले की, यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी जो अहवाल मागितला होता तो त्यांना दिला असून त्यानूसार ते लवकरच निर्णय घेतील. पण असे असले तरी युवासेना अधिकारी, नगरसेवक दिपेश म्हात्रे यांना सत्ताधारी असूनही आंदोलन करावी लागतात हे हास्यास्पद आहे. ती नौटंकीच म्हणावी लागेल. महापालिकेला विरोधी पक्ष म्हणुन आम्हीच सत्ताधारी असल्यासारखे पर्याय दिले, त्यात टाटा लाईनखालील जागेचा मोठा पर्याय दिला. पण शिवसेनेचेच जेष्ठ नगसेवक त्या प्रस्तावाला विरोध करत आहेत. यावरुनच शिवसेनेला फेरीवाला प्रश्न सोडवण्यात किती स्वारस्य आहे हे स्पष्ट होत असल्याची टिका हळबे यांनी केली.तसेच भाजपाचे नगरसेवक हे प्रभाग समितीमध्ये अधिका-यांना सांगतात की फेरीवाला अतिक्रमण हटाव पथकाचे काम हे कलेक्शन करणे आहे. पण असे सांगून भाजपा देखिल सत्ताधारीच आहे ते या समस्ये संदर्भात पळवाट काढू शकत नाहीत. मनसेच्याच वॉर्डात केवळ फेरीवाला समस्या नसून भाजपाच्या विश्वदीप पवार यांच्या वॉर्डातही ही समस्या आहे. पण त्याबद्दल कोणी ब्र काढत नाही असे का? असा सवालही हळबेंनी केला. तसेच मनसेच्या वॉर्डात जे फेरीवाले आहेत ते काही आताचे नसून ती समस्या निर्माण करायला सत्ताधारीच जबाबदार नाहीत का? असेही ते म्हणाले. पर्याय देऊनही तो स्विकारायचा नाही, स्वत: पर्याय द्यायचा नाही, दुस-याने काम केले तर त्याची दखल घ्यायची नाही अशी विचित्र कोंडी या ठिकाणी झाली असल्याने समस्या कशी सुटायची हा खरच ग ंभीर प्रश्न झाल्याचे हळबे हतबत होऊन म्हणाले.हळबेंनी करुन दाखवावे. फेरीवाल्यांविरोधात कावाई करणे असो की, त्यांचे पुर्नवसन करणे असो जेवढा भाजपाने पाठपुरावा केला तेवढा कोणी केला नसेल, म्हणुनच माझ्या वॉर्डातील पदपथ बघावे किती मोकळे आहेत आणि हळबेंच्या पाटकर रोड, डॉ.राथ रोड आणि एस.व्ही रोड आदी ठिकाणांसह आता चिपळुणकर रोडला लागणारी पाणी पुरीची गाडी या सगळया बाबी नागरिक स्वत: उघड्या डोळयांनी बघत आहेत वेगळे काही सांगायला नको. यातून जो अर्थबोध व्हायचा तो सगळयांना होत असल्याचा प्रतीटोला शिवमार्केटचे नगरसेवक विश्वदीप पवार यांनी लगावला.मंदार हळबे यांच्यावर फेरीवाल्यांच्या शेकडो जणांच्या सभेत जे आरोप झालेत त्याचे काय? पैसे घेतात अशा स्वरुपाचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षिय राजकारण करण्यापेक्षा ही समस्या कशी सोडवली जाईल हे बघावे. त्यांच्याच वॉर्डात सर्वाधिक फेरीवाले आहेत हे तर उघड सत्य आहे की नाही हे का ते मान्य करत नाहीत असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली