शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

आरे पाठोपाठ आता ठाण्यात मेट्रोसाठी रात्री वृक्षतोड; मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 09:41 IST

मनसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली; सध्या प्रशासनानं वृक्षतोड थांबवली

ठाणे: एकीकडे मुंबईत आरे कॉलनीत रात्री मेट्रो कारशेडसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्यानंतर आता ठाण्यातही मध्यरात्री दोन वाजता मेट्रोच्या कामासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याठिकाणी धाव घेऊन ही कत्तल थांबवण्यासाठी प्रयत्न केला.मेट्रोच्या कामासाठी झाडांच्या केवळ छाटणीची परवानगी देण्यात आली होती. मात्र छाटणी न करता अचानक रात्री दोनच्या सुमारास या झाडांची कत्तल करण्यात आली, असा आरोप मनसेनं केला. याविषयीची माहिती मनसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृक्षांची कत्तल थांबवली. वृक्षांची कत्तल करायची होती, तर ती विश्वासात घेऊन करणं अपेक्षित होतं. मेट्रो ही काळाची गरज आहे. मात्र अशा प्रकारे अंधाराचा फायदा घेऊन वृक्षांची कत्तल करणं योग्य असल्याची प्रतिक्रिया मनसेकडून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. जवळजवळ पहाटे तीनपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. अखेर वृक्षतोडीचं काम थांबवण्यात आलं. आता यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित प्राधिकरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या  झाडांची कत्तल केली जात असताना तिथे वनविभागाचा किंवा संबंधित विभागाचा अधिकारी उपस्थित असणं गरजेचं होतं. मात्र मध्यरात्री झाडांची कत्तल होत असताना एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे घडलेला प्रकार चुकीचा असल्याचं मत मनसेनं व्यक्त केलं आहे. वृक्षतोडीसाठी धोरणं आखा आणि वृक्षांवर कुऱ्हाड चालवताना लोकांना विश्वासात घेण्याची मागणी या घटनेनंतर होऊ लागली आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोAarey Coloneyआरे