शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

झोपडपट्ट्यांतून जाहिरातींचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 1:31 AM

पालिका, रेल्वेचे नुकसान : अंबरनाथ स्थानक परिसरात बेकायदा फलक, दलालांसोबत आर्थिक हितसंबंध

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या स्वामीनगर झोपडपट्टीत जाहिरातींचा व्यवसाय तेजीत आला आहे. स्थानकाला लागूनच झोपडपट्टी असल्याने अनेक झोपडपट्टीधारकांनी जाहिराती करणाऱ्या दलालांसोबत आर्थिक हितसंबंध तयार करून आपल्या झोपडीसमोर जाहिरातीचे फलक लावण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या जाहिरात फलकांवर जाहिरातीही प्रसिद्ध होत आहेत. जाहिरातींचा महसूल ना रेल्वेला, ना पालिकेला. त्यामुळे या बेकायदा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

अंबरनाथ फलाट क्रमांक-१ आणि २ च्या समोरच स्वामीनगरची मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टी आणि स्थानकामध्ये काहीच नसल्याने स्थानकातून थेट या झोपड्या दिसतात. स्थानक परिसरातील जाहिरात फलकांवर रेल्वे लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहे. त्यामुळे आता या भागातील झोपडपट्टीधारकांना हाताशी धरून काही दलालांनी जाहिरातीचा बेकायदा व्यवसाय सुरू केला आहे. रेल्वेस्थानकाला समांतर असलेल्या झोपड्यांसमोरच मोठे जाहिरातीचे फलक उभारण्यात आले आहेत. काही फलक झोपड्यांवर आहेत, तर काही झोपड्यांसमोर लावण्यात आले आहेत. हे फलक रेल्वेस्थानकात उभे राहणाºया सर्व प्रवाशांना दिसत असल्याने या बेकायदा फलकांवर जाहिरात करण्यासाठीही अनेक व्यावसायिक पुढे आले आहेत.

स्थानकासमोर चार ते पाच बेकायदा फलक उभारण्यात आले असून या सर्व फलकांवर बिल्डर, चाळींचे बांधकाम करणारे बिल्डर आणि डॉक्टरांच्या जाहिराती झळकत आहेत. या बेकायदा जाहिरात फलकांवर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्या जाहिरातींचे फलक स्थानकाच्या परिसरात लावण्यात आले आहेत, ती जागा पालिकेच्या हद्दीत आहे. तर, त्याला लागूनच आता अंबरनाथ स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारला जात असल्याने या जाहिरातींना आणखी तेजी येणार आहे. त्यामुळे या जाहिरातींचे फलक उभारणाऱ्यांकडून दंडात्मक वसुली करण्याची मागणी केली जात आहे.

दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे स्थानकात येणाºया नैसर्गिक हवेचा मार्गच बंद केला आहे. हवेच्या मार्गामध्ये जाहिरात फलक येत असल्याने स्थानक आणि स्थानक परिसरातील काही फलक काढण्याची गरज व्यक्त होत आहे. चारही बाजूने जाहिरात फलकांचा विस्तार होत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोकास्थानकात ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात, तेथे त्यांच्या डोक्यावरही लहान फलक तारेने बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा फलक प्रवाशांच्या डोक्यावर पडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने असे धोकादायक फलक काढावे अशी मागणी केली जात आहे.