शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

'दत्तक प्रक्रिया सुलभ होण्याची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:55 IST

भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले.

- पंकज रोडेकर भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले. आशिकच्या सुटकेची धाडसी कामगिरी बजावणारे ठाणे शहर पोलीस दलातील भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याशी साधलेला संवाद.......या गुन्ह्याचा शोध कसा लागला व त्यासाठी नेमके काय केले?हा गुन्हा दाखल झाल्यावर सुरुवातीला भिवंडीतील पद्मानगर येथे चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी तेथील नागरिकांशी बोलताना काही जण गुन्हा घडला, त्याचदिवशी उत्तरप्रदेशला गेल्याचे समजले. त्यामध्ये एक मराठी तरुण असल्याने त्याच्यावर संशय बळावला. सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरूणाचे हावभाव त्याच्याशी मिळते-जुळते असल्याने संशय वाढला. त्यातूनच हा गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी ठरलो.आशिक उत्तर प्रदेशात असल्याने आरोपीला पकडण्यास स्थानिक पोलिसांचा कसा प्रतिसाद लाभला?या गुन्ह्यातील आरोपी आणि ते बाळ उत्तर प्रदेशात असल्याचे स्पष्ट झाल्यावर एका सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक महिलेला तेथे पाठवले. त्यावेळी तेथील स्थानिक पोलिसांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याने आशिकची सुटका आली आणि रोहित कोटेकर यालाही जेरबंद क रता आले.अपहरणाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालकांनी कशी काळजी घ्यावी?दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढत होताना आपण पाहत आहोत. पण, आपल्या चिमुरड्यांचे अपहरण होऊ नये, यासाठी पालकांनी त्याला एकटे सोडू नये. त्यांनी त्याला आपल्या नजरेआड करू नये. त्यामुळे पुढे होणाºया त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ओढावणार नाही.कशामुळे हे प्रकार वाढले आहेत?या घटनांचा अभ्यास केल्यास हे प्रकार प्रामुख्याने मूलबाळ होत नसल्याने वाढल्याचे दिसत आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना, आपल्याकडील दत्तक प्रक्रिया खूपच किचकट आहे. ज्यांना मुले होत नाही, ते मुले दत्तक घेण्यास आसुरलेले असतात. पण, या प्रक्रियेमुळे मूल घेता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया काही प्रमाणात शिथिल होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.एखादा हरवलेला चिमुरडा काही महिन्यांनी मिळाल्यावर त्याची ओळख कशी पुढे आणता?जर एखादे बालक हरवल्यानंतर मिळाल्यावर तो नेमका आहे का, यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे डीएनएचा. त्यामुळे आधारकार्ड किंवा अन्य पर्याय तूर्तास तरी ग्राह्य मानला जात नसल्याचे तपासात दिसते.