शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

'दत्तक प्रक्रिया सुलभ होण्याची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:55 IST

भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले.

- पंकज रोडेकर भिवंडीतून अपहरण झालेल्या आशिक हरजन या एक वर्षीय चिमुरड्याची अवघ्या आठ दिवसांत मोठ्या शिताफीने परराज्यातून सुखरूप सुटका केली आणि त्या अपहरणकर्त्याला जेरबंदही केले. आशिकच्या सुटकेची धाडसी कामगिरी बजावणारे ठाणे शहर पोलीस दलातील भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याशी साधलेला संवाद.......या गुन्ह्याचा शोध कसा लागला व त्यासाठी नेमके काय केले?हा गुन्हा दाखल झाल्यावर सुरुवातीला भिवंडीतील पद्मानगर येथे चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी तेथील नागरिकांशी बोलताना काही जण गुन्हा घडला, त्याचदिवशी उत्तरप्रदेशला गेल्याचे समजले. त्यामध्ये एक मराठी तरुण असल्याने त्याच्यावर संशय बळावला. सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरूणाचे हावभाव त्याच्याशी मिळते-जुळते असल्याने संशय वाढला. त्यातूनच हा गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी ठरलो.आशिक उत्तर प्रदेशात असल्याने आरोपीला पकडण्यास स्थानिक पोलिसांचा कसा प्रतिसाद लाभला?या गुन्ह्यातील आरोपी आणि ते बाळ उत्तर प्रदेशात असल्याचे स्पष्ट झाल्यावर एका सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक महिलेला तेथे पाठवले. त्यावेळी तेथील स्थानिक पोलिसांकडून चांगला प्रतिसाद लाभल्याने आशिकची सुटका आली आणि रोहित कोटेकर यालाही जेरबंद क रता आले.अपहरणाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालकांनी कशी काळजी घ्यावी?दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढत होताना आपण पाहत आहोत. पण, आपल्या चिमुरड्यांचे अपहरण होऊ नये, यासाठी पालकांनी त्याला एकटे सोडू नये. त्यांनी त्याला आपल्या नजरेआड करू नये. त्यामुळे पुढे होणाºया त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ओढावणार नाही.कशामुळे हे प्रकार वाढले आहेत?या घटनांचा अभ्यास केल्यास हे प्रकार प्रामुख्याने मूलबाळ होत नसल्याने वाढल्याचे दिसत आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना, आपल्याकडील दत्तक प्रक्रिया खूपच किचकट आहे. ज्यांना मुले होत नाही, ते मुले दत्तक घेण्यास आसुरलेले असतात. पण, या प्रक्रियेमुळे मूल घेता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया काही प्रमाणात शिथिल होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.एखादा हरवलेला चिमुरडा काही महिन्यांनी मिळाल्यावर त्याची ओळख कशी पुढे आणता?जर एखादे बालक हरवल्यानंतर मिळाल्यावर तो नेमका आहे का, यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे डीएनएचा. त्यामुळे आधारकार्ड किंवा अन्य पर्याय तूर्तास तरी ग्राह्य मानला जात नसल्याचे तपासात दिसते.