शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:46 IST

आराखडा तयार करण्याचे आदेश : जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निसर्गाचे वरदान जिल्ह्याला लाभले आहे. येथील पर्यटनस्थळे मुंबई, पुणेकरांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्हा प्रशासन यंदापासून त्यांचा विकास आराखडा करीत आहे. त्यासाठी खास जिल्हा पर्यटन अधिकारीपदाची निर्मिती करून अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोणकोणत्या पर्यटनस्थळांचा विकास करायचा, ते निश्चित करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना मोठा रोजगार तर उपलब्ध होईलच, शिवाय मानव विकास निर्देशांक वाढण्यासही मदत होणार आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३३ क दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. तिथे आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जातो. मात्र, त्यांचा सर्वांगीण विकास करून मुंबई, ठाण्यातून येणाºया पर्यटकांना या पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचा विकास करण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अशी पर्यटनस्थळे निश्चित करुन त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या कामाला गती मिळावी, यासाठी स्वतंत्र जिल्हा पर्यटन अधिकारीपदाची निर्मिती करून त्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमधील माळशेज घाट या पर्यटनस्थळाला मुंबई, ठाणेकर पर्यटकांची पसंती आहे. याप्रमाणेच जिल्ह्यात प्राचीन गड, किल्ले, तलाव, खाडीकिनाऱ्यांच्या चौपाटी, उद्याने, जंगल, धरण, नद्या, तीर्थक्षेत्र आदी ठिकाणांचा शोध घेऊन त्यांचाही विकास करण्याच्या दृष्टीने, सोयीसुविधा पुरवण्यासाठी, तिथे जाणारे रस्ते, तेथील आसनव्यवस्था, परिसराचे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचा विकास साधण्याचा उपक्रम पालकमंत्र्यांनी हाती घेतला आहे. या पर्यटनातून मोठ्या प्रमाणात प्रशासनास उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.लोकप्रतिनिधींनीही पर्यटनस्थळांची माहिती द्यावीलोकप्रतिनिधींनीही त्यांच्या कार्यक्षेत्रातील पर्यटनास उपयुक्त ठरणारी ठिकाणे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देऊन त्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना डीपीसीच्या बैठकीत दिल्या आहेत.यंदाच्या विकास आराखड्यातदेखील सध्याच्या ३३ क दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या विकासाकरिता भरीव निधी खर्च करण्याची तरतूद केलेली आहे. याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊन जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.