शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:46 IST

आराखडा तयार करण्याचे आदेश : जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निसर्गाचे वरदान जिल्ह्याला लाभले आहे. येथील पर्यटनस्थळे मुंबई, पुणेकरांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्हा प्रशासन यंदापासून त्यांचा विकास आराखडा करीत आहे. त्यासाठी खास जिल्हा पर्यटन अधिकारीपदाची निर्मिती करून अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोणकोणत्या पर्यटनस्थळांचा विकास करायचा, ते निश्चित करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना मोठा रोजगार तर उपलब्ध होईलच, शिवाय मानव विकास निर्देशांक वाढण्यासही मदत होणार आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३३ क दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. तिथे आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जातो. मात्र, त्यांचा सर्वांगीण विकास करून मुंबई, ठाण्यातून येणाºया पर्यटकांना या पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचा विकास करण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अशी पर्यटनस्थळे निश्चित करुन त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या कामाला गती मिळावी, यासाठी स्वतंत्र जिल्हा पर्यटन अधिकारीपदाची निर्मिती करून त्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमधील माळशेज घाट या पर्यटनस्थळाला मुंबई, ठाणेकर पर्यटकांची पसंती आहे. याप्रमाणेच जिल्ह्यात प्राचीन गड, किल्ले, तलाव, खाडीकिनाऱ्यांच्या चौपाटी, उद्याने, जंगल, धरण, नद्या, तीर्थक्षेत्र आदी ठिकाणांचा शोध घेऊन त्यांचाही विकास करण्याच्या दृष्टीने, सोयीसुविधा पुरवण्यासाठी, तिथे जाणारे रस्ते, तेथील आसनव्यवस्था, परिसराचे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचा विकास साधण्याचा उपक्रम पालकमंत्र्यांनी हाती घेतला आहे. या पर्यटनातून मोठ्या प्रमाणात प्रशासनास उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.लोकप्रतिनिधींनीही पर्यटनस्थळांची माहिती द्यावीलोकप्रतिनिधींनीही त्यांच्या कार्यक्षेत्रातील पर्यटनास उपयुक्त ठरणारी ठिकाणे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देऊन त्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना डीपीसीच्या बैठकीत दिल्या आहेत.यंदाच्या विकास आराखड्यातदेखील सध्याच्या ३३ क दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या विकासाकरिता भरीव निधी खर्च करण्याची तरतूद केलेली आहे. याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊन जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.