शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

फेरीवाल्यांवरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; रस्त्यावर गॅस सिलिंडरचा सर्रास वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 10:56 IST

मीरा रोड : शहरातील मुख्य रस्ते - नाक्यांवरील ना फेरीवाला क्षेत्रात तसेच रेल्वे स्थानकापासून १५० मीटर, तर रुग्णालय, शैक्षणिक ...

मीरा रोड : शहरातील मुख्य रस्ते - नाक्यांवरील ना फेरीवाला क्षेत्रात तसेच रेल्वे स्थानकापासून १५० मीटर, तर रुग्णालय, शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असताना मीरा-भाईंदर महापालिका मात्र अशा फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर गल्लीपासून पालिका मुख्यालयापर्यंत अर्थपूर्ण वरदहस्त असल्याचे आरोप जनसामान्यांकडून होत आहेत.

भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानकास फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. आधीच रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी होऊन चालणेसुद्धा अवघड झालेले आहे. शहरातील मुख्य रस्ते, पदपथ, प्रमुख नाके व गर्दीची सार्वजनिक ठिकाणेदेखील बेकायदा फेरीवाले, टपरी व हातगाडीवाल्यांच्या विळख्यात अडकलेली आहेत. अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन नागरिकांसाठी पदपथच शिल्लक राहिलेले नाहीत. या बेकायदा फेरीवाल्यांना अनधिकृतपणे वीज पुरवठा केला जात असताना वीज कंपन्यांना पालिकेने केवळ पत्र देऊन हात वर केले आहेत. वीज कंपन्यासुद्धा बेकायदा वीज जोडण्यांवर कारवाई करीत नाहीत. फेरीवाले व हातगाडीवाले बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तू वापरत असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. रस्त्यावर हातगाडीवाले गॅस सिलिंडरचा सर्रास वापर करीत असून, आग लागण्याच्या दुर्घटना होऊनदेखील पालिका गंभीर नाही.

हातगाड्या, फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाईसाठी नेमलेली फेरीवाला पथके व त्यांचे प्रमुख प्रभाग अधिकारी यांच्याकडून सातत्याने कारवाई केली जात नाही. मुळात फेरीवाला विरोधी पथकाने दिवस-रात्र गस्त घालून कारवाई करणे व आपल्या भागात फेरीवाले नसल्याचे छायाचित्र वरिष्ठांना सादर करणे आवश्यक आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारीच गंभीर नसल्याने ठोस कारवाई तर सोडाच, उलट नवनवीन फेरीवाले झपाट्याने वाढत आहेत.

व्यापक कारवाईची गरज

फेरीवाल्यांवर विशेषतः सायंकाळी व रात्री व्यापक कारवाईची गरज आहे. फेरीवाले वाढल्याने मुख्यत्वे बाजार वसुली ठेकेदाराचा मोठा फायदा होत आहे. फेरीवाल्यांकडून वसुलीचे प्रकार पूर्वीसुद्धा उघड झाले असून, फेरीवाला हा कमाईचे सोपे साधन मानले जात आहे. फेरीवाल्यांविरुद्ध मुद्दा तापला की थातूरमातूर कारवाई दाखवून प्रसिद्धी मिळवायची असा कार्यक्रम जणू पालिकेचा सुरू आहे. त्यामुळे यामागे भ्रष्टाचाराचा संशय जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे