शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून परदेशी कंपन्यांचा प्रवेश, औषध विक्रेत्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 20:02 IST

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी या संदर्भात सांगितले की, आरोग्य सेतू अॅप सुरु करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकल अशी घोषणा केली होती.

ठाणे : कोरोनाची माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ई फार्मसीद्वारे औषधविक्री करण्यास परदेशी गुंतवणूक असलेल्या कंपन्यांना परवानगी दिली जात आहे. त्यामुळे या आरोग्य सेतू अॅपचा दुरुपयोग करुन व्यापारीकरण केले जात असल्याने औषध विक्रेत्याने निती आयोगाच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. यातून सरकारची दुटप्पी भूमिका उघड होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी या संदर्भात सांगितले की, आरोग्य सेतू अॅप सुरु करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकल अशी घोषणा केली होती. तसेच स्वदेशीचा नारा दिला होता. आत्ता हाच नारा केवळ भूलथापा देणारा ठरला आहे. त्याचे कारण परदेशी गुंतवणूक असलेल्या कंपन्यांना ई फार्मसीद्वारे औषध विक्री करण्यास सरकारने प्लॅटफार्म उपलब्ध करुन दिला आहे. औषध विक्रेता संघटना गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर औषध विक्री व्यवसायाच्या विरोधात लढा देत आहेत. केंद्र सरकारसोबत या विषयावर चर्चा झाली आहे. त्याचबरोबर दिल्ली उच्च न्यायालयाने ई फार्मसी ऑनलाईनद्वारे औषधविक्री बेकादेशीर ठरवून त्याला स्थगिती दिली आहे, असे असताना निती आयोगाने असा निर्णय घेणो हा बेकायदेशीर आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे. लॉकडाऊनचे संकट सुरु झाल्यापासून स्थानिक औषध विक्रेत्यांनी सर्व स्तरावर त्यांची सेवा दिली आहे. त्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करणे दूरच राहिले. त्याऐवजी अशा प्रकारे परदेशी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्याना औषध विक्रीची मुभा देऊन स्थानिक औषध विक्रेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. 

राज्यातील 70 हजार औषध विक्रेत्यांसह देशभरातील 8 लाख 50 हजार विक्रेत्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. तसेच आरोग्य सेतूचा गैरवापर थांबविण्याची मागणी केली आहे. सरकार असे दुटप्पी धोरण अवलंबिणार असेल तर औषध विक्रेत्यांनी त्यांच्या जीवावर उदार होऊन कोरोनाच्या काळात त्यांची सेवा का द्यावी असा संतप्त सवाल औषध विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात ऑनलाईन औषध विक्रीची सेवा देणो शक्य आहे का? कारण राज्यातील अनेक ग्रामीण भागात विजेची समस्या आहे. इंटरनेट सेवा नाही. त्याठिकणी कोणत्या उपाययोजना राबविणार आहेत याची हमी सरकारने देणो आवश्यक आहे. सरकारने आरोग्य सेतूचा गैरवापर त्वरीत थांबवून परदेशी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना ई फार्मसीची दिलेली मुभाही रद्द करण्यात यावी. अन्यथा औषध विक्रेते त्यांची सेवा थांबवतील असा इशारा या औषध विक्रेत्यांकडून दिला गेला आहे. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणmedicineऔषधं