शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कावेसरच्या आदिवासींनी दाखल केली ठाण्याच्या जिल्हाधिका-यांविरुद्ध अवमान याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 9:54 PM

राज्य शासनाच्या जागेत निवा-यासाठी अतिक्रमित केलेल्या जागांचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असतांनाही त्याचे पालन झालेले नाही.

ठाणे - राज्य शासनाच्या जागेत निवा-यासाठी अतिक्रमित केलेल्या जागांचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असतांनाही त्याचे पालन झालेले नाही. त्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाºयांविरुद्ध कोलशेत, कावेसर येथील हजारो रहिवाशांनी एकत्र येत अवमान याचिका दाखल केल्याची माहिती आदीवासी पुनर्वसन आदोलन आणि गावकरी समन्वय समितीचे अ‍ॅड. किशोर दिवेकर यांनी दिली आहे.गेल्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोलशेत, कावेसर येथील राज्य शासनाच्या सरकारी जागेत निवाºयासाठी अतिक्रमित केलेल्या मागासवर्गीय तसेच अन्य रहिवाशांनी जागा आपल्या नावे मंजूर होण्यासाठी महसूल प्रशासनाकडे कब्जे हक्काची रक्कम, अकृषिक अकारणी आणि दंड भरण्यास तयार असल्याचा पत्रव्यवहार जिल्हा प्रशासनाकडे केला आहे. मोर्चे आंदोलने करुनही या मुळ रहिवाशांचा मागणी अर्ज निकाली न काढल्याने नाईलाजाने येथील गावकºयांनी एकत्र येत आदीवासी पुनर्वसन आंदोलन आणि गाावकरी समन्वय समिती यांच्या संयुक्त माध्यमातून २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ५ आॅक्टोबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका मंजूर करुन या संबंधिचा अर्ज शीघ्र गतीने निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी गावकरी समितीच्या पदाधिकाºयांना आपल्या दालनात बोलवून या याचिकेची तातडीने अंमलबजावणी करुन सर्व अर्जदारांचे अर्ज निकाली काढून योग्य तो न्याय देण्यात येईल, असे त्यावेळी संबोधित केले. मात्र, त्यानंतरही सहा महिने पाठपुरावा करुनही त्यावर काहीच हालचाली झाल्या नाहीत.निवारा मुलभूत हक्कसाठी कोणतीही कायदेशीर कार्यवाही करुन संबंधितांनाही न्याय देण्याचा महसूल प्रशासनाचा कल दिसून आला नाही. त्यामुळे न्यायालयाच्याच आदेशाची अंमलबजावणी न केल्याने जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासह सह जणांविरुद्ध अवमान याचिका दाखल केल्याचे अ‍ॅड. दिवेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय