शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 01:47 IST

पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : देशाच्या फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजातील ९५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कल्याणजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या जागी वसवण्यात आले. या वसाहतीला उल्हासनदीवरून उल्हासनगर हे नाव देण्यात आले. पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला. ते एक वर्षाचा व्हिसा घेऊ न भारतात राहत असून दोन हजारांपेक्षा जास्त ही संख्या आहे. या सिंधी बांधवांना नागरिकत्व विधेयकाचा फायदा होणार असल्याने संसदेत विधेयक मंजूर होताच शहरात पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला.

दरवर्षी वाढीव व्हिसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे निर्वासित सिंधी बांधवांना झिजवावे लागत आहे. १०० पेक्षा जास्त नागरिकात्वाचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून एक वर्षाचा व्हिसा घेणाºया सिंधी बांधवाची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती जय झुलेलाल संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी दिली. गेल्या आठवड्यात १० अर्ज चौकशीसाठी उल्हासनगर तहसील कार्यालयात आल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

नागरिकांत्वाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे शहरात राहणाºया दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती १९९५ पासून व्हिसावर राहत असलेल्या जलाराम दिवाणी यांनी दिली. २४ वर्षांपासून ते शहरात राहत असून नागरिकत्वाअभावी मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. तसेच घर, जमीनही खरेदी करता येत नाही. तसेच, स्वत:च्या नावाने व्यवसायही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानमधील हजारो सिंधी समाज भारताच्या आश्रयाला येणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

सिंधी समाज व्यावसायिक असल्याने देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या सर्व लोकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा विश्वास आमदार कुमार आयलानी आणि जय झुलेलाल संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी व्यक्त केली आहे.

धर्म परिवर्तनाच्या भीतीमुळे आश्रय

पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या सिंधी समाजासह विविध धर्माच्या नागरिकांवर अन्याय होत आहे. हजारो जणांचे धर्मपरिवर्तन करत असल्याचे चित्र पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे सिंधी समाजाने धर्मासाठी घरे, जमीन, संपत्ती सोडून कुटुंब आणि नातेवाइकांसह विस्थापित होणे पसंत केले. कट्टर हिंदू आणि देशभक्त असणारा सिंधी समाज देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावणार असल्याची प्रतिक्रिया मंगलानी यांनी व्यक्त केले.ंू

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकulhasnagarउल्हासनगरthaneठाणेIndiaभारतPakistanपाकिस्तानBJPभाजपा