शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 01:47 IST

पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : देशाच्या फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजातील ९५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कल्याणजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या जागी वसवण्यात आले. या वसाहतीला उल्हासनदीवरून उल्हासनगर हे नाव देण्यात आले. पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला. ते एक वर्षाचा व्हिसा घेऊ न भारतात राहत असून दोन हजारांपेक्षा जास्त ही संख्या आहे. या सिंधी बांधवांना नागरिकत्व विधेयकाचा फायदा होणार असल्याने संसदेत विधेयक मंजूर होताच शहरात पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला.

दरवर्षी वाढीव व्हिसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे निर्वासित सिंधी बांधवांना झिजवावे लागत आहे. १०० पेक्षा जास्त नागरिकात्वाचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून एक वर्षाचा व्हिसा घेणाºया सिंधी बांधवाची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती जय झुलेलाल संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी दिली. गेल्या आठवड्यात १० अर्ज चौकशीसाठी उल्हासनगर तहसील कार्यालयात आल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

नागरिकांत्वाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे शहरात राहणाºया दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती १९९५ पासून व्हिसावर राहत असलेल्या जलाराम दिवाणी यांनी दिली. २४ वर्षांपासून ते शहरात राहत असून नागरिकत्वाअभावी मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. तसेच घर, जमीनही खरेदी करता येत नाही. तसेच, स्वत:च्या नावाने व्यवसायही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानमधील हजारो सिंधी समाज भारताच्या आश्रयाला येणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

सिंधी समाज व्यावसायिक असल्याने देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या सर्व लोकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा विश्वास आमदार कुमार आयलानी आणि जय झुलेलाल संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी व्यक्त केली आहे.

धर्म परिवर्तनाच्या भीतीमुळे आश्रय

पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या सिंधी समाजासह विविध धर्माच्या नागरिकांवर अन्याय होत आहे. हजारो जणांचे धर्मपरिवर्तन करत असल्याचे चित्र पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे सिंधी समाजाने धर्मासाठी घरे, जमीन, संपत्ती सोडून कुटुंब आणि नातेवाइकांसह विस्थापित होणे पसंत केले. कट्टर हिंदू आणि देशभक्त असणारा सिंधी समाज देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावणार असल्याची प्रतिक्रिया मंगलानी यांनी व्यक्त केले.ंू

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकulhasnagarउल्हासनगरthaneठाणेIndiaभारतPakistanपाकिस्तानBJPभाजपा