शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 11:13 PM

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. महापूरामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागणार्‍या या आपत्तीग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचे हात पुढे आले. त्यात  ठाण्यातील आई प्रतिष्ठान तसेच कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण बिसनेस फोरम आणि रमाई  सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोकणवासियांना मदतीचा हात दिला. सुमारे दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य, कपडे, चटई, भांडी, पाणी, महिलांचे साहित्य, साबण, मेणबत्ती, माचिस, औषधे, ताडपत्री आदी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण केले. त्याचबरोबर पुरग्रस्तांची तपासणी करीत त्यांच्यावर उपचारही केले.

आई सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार दिलीप शिंदे, अध्यक्ष संतोष शिंदे  आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, डॉ. दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत चार ट्रक भरून साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ढगफुटीमुळे महाड शहर पुरात बुडाले. तर तळीये गावात दरड कोसळून 84 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच खेडमधील पोसरेमध्ये भुस्खलन  होऊन 17 जण मृत्यू पावले. चिपळूण शहर बुडाला. महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील अनेक गांवे हे पाण्याखाली गेली आणि सहा हजार कोटींचे  नुकसान झाले. त्या पुरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी राज्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. तरी ही ज्या गावांना मदत पोहचली नाही, अशा कातकरी, धनगर वस्ती व गावांमध्ये या संस्थांनी पोहचण्याचा प्रयत्न केला.  महाड आणि शेजारील वाड्या, वस्त्या, खेड तालुक्यातील चिंचघर, पोसरे, सापिर्ली, चोरवणे, सापर्ली देऊळवाडी, कातकर वाडी, साखर, कासई, धामनंद, कावळे, तळवट, पाली, खोपी, शिरगांव, धामनंद, चोरवणेमधील सुतारवाडी, उतेकरवाडी, डांगेवाडी, सार्पिली आणि पोसरे गावातील कातकरी वाडी, चिपळूण, दळवटणे, हिंगवलेवाडी, पेढे, बहादूरशेख नाका, कलबस्ते, शंकरवाडी, खेर्डी, सती, काना पिंपरी, खडपोली, गानेखडपोली येथील नदीपात्रातील धनगर व कातकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. साहित्य वाटपासह धामनंद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सदानंद जाधव, डॉ. भगवान गायकवाड, डॉ. दिगंबर वडजे, डॉ. संपदा जाधव, संजय काटकर यांनी सुमारे 95 ग्रामस्थांची तपासणी केली. शुगर तपासणीसह अन्य तपासण्या करीत त्यांना मोफत औषधे ही दिली.

या पुरग्रस्त भागामध्ये तीन दिवस राहून पत्रकार दिलीप शिंदे, संतोष शिंदे, रमाई ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शशी गमरे, अ‍ॅड. राणू गमरे, विश्‍वास शिंदे, विकास माहिमकर, सचिन झंझाड, संतोष शेलार, रोहन खाडे यांनी ग्रामस्थांना मदत पोहचवली. तसेच धामनंद ग्रामपंचायत सदस्य संभाजी उतेकर यांनी मदत केली.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरRainपाऊसlandslidesभूस्खलन