शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 23:14 IST

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. महापूरामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागणार्‍या या आपत्तीग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचे हात पुढे आले. त्यात  ठाण्यातील आई प्रतिष्ठान तसेच कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण बिसनेस फोरम आणि रमाई  सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोकणवासियांना मदतीचा हात दिला. सुमारे दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य, कपडे, चटई, भांडी, पाणी, महिलांचे साहित्य, साबण, मेणबत्ती, माचिस, औषधे, ताडपत्री आदी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण केले. त्याचबरोबर पुरग्रस्तांची तपासणी करीत त्यांच्यावर उपचारही केले.

आई सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार दिलीप शिंदे, अध्यक्ष संतोष शिंदे  आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, डॉ. दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत चार ट्रक भरून साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ढगफुटीमुळे महाड शहर पुरात बुडाले. तर तळीये गावात दरड कोसळून 84 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच खेडमधील पोसरेमध्ये भुस्खलन  होऊन 17 जण मृत्यू पावले. चिपळूण शहर बुडाला. महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील अनेक गांवे हे पाण्याखाली गेली आणि सहा हजार कोटींचे  नुकसान झाले. त्या पुरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी राज्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. तरी ही ज्या गावांना मदत पोहचली नाही, अशा कातकरी, धनगर वस्ती व गावांमध्ये या संस्थांनी पोहचण्याचा प्रयत्न केला.  महाड आणि शेजारील वाड्या, वस्त्या, खेड तालुक्यातील चिंचघर, पोसरे, सापिर्ली, चोरवणे, सापर्ली देऊळवाडी, कातकर वाडी, साखर, कासई, धामनंद, कावळे, तळवट, पाली, खोपी, शिरगांव, धामनंद, चोरवणेमधील सुतारवाडी, उतेकरवाडी, डांगेवाडी, सार्पिली आणि पोसरे गावातील कातकरी वाडी, चिपळूण, दळवटणे, हिंगवलेवाडी, पेढे, बहादूरशेख नाका, कलबस्ते, शंकरवाडी, खेर्डी, सती, काना पिंपरी, खडपोली, गानेखडपोली येथील नदीपात्रातील धनगर व कातकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. साहित्य वाटपासह धामनंद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सदानंद जाधव, डॉ. भगवान गायकवाड, डॉ. दिगंबर वडजे, डॉ. संपदा जाधव, संजय काटकर यांनी सुमारे 95 ग्रामस्थांची तपासणी केली. शुगर तपासणीसह अन्य तपासण्या करीत त्यांना मोफत औषधे ही दिली.

या पुरग्रस्त भागामध्ये तीन दिवस राहून पत्रकार दिलीप शिंदे, संतोष शिंदे, रमाई ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शशी गमरे, अ‍ॅड. राणू गमरे, विश्‍वास शिंदे, विकास माहिमकर, सचिन झंझाड, संतोष शेलार, रोहन खाडे यांनी ग्रामस्थांना मदत पोहचवली. तसेच धामनंद ग्रामपंचायत सदस्य संभाजी उतेकर यांनी मदत केली.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरRainपाऊसlandslidesभूस्खलन