शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 23:14 IST

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. महापूरामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागणार्‍या या आपत्तीग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचे हात पुढे आले. त्यात  ठाण्यातील आई प्रतिष्ठान तसेच कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण बिसनेस फोरम आणि रमाई  सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोकणवासियांना मदतीचा हात दिला. सुमारे दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य, कपडे, चटई, भांडी, पाणी, महिलांचे साहित्य, साबण, मेणबत्ती, माचिस, औषधे, ताडपत्री आदी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण केले. त्याचबरोबर पुरग्रस्तांची तपासणी करीत त्यांच्यावर उपचारही केले.

आई सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार दिलीप शिंदे, अध्यक्ष संतोष शिंदे  आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, डॉ. दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत चार ट्रक भरून साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ढगफुटीमुळे महाड शहर पुरात बुडाले. तर तळीये गावात दरड कोसळून 84 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच खेडमधील पोसरेमध्ये भुस्खलन  होऊन 17 जण मृत्यू पावले. चिपळूण शहर बुडाला. महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील अनेक गांवे हे पाण्याखाली गेली आणि सहा हजार कोटींचे  नुकसान झाले. त्या पुरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी राज्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. तरी ही ज्या गावांना मदत पोहचली नाही, अशा कातकरी, धनगर वस्ती व गावांमध्ये या संस्थांनी पोहचण्याचा प्रयत्न केला.  महाड आणि शेजारील वाड्या, वस्त्या, खेड तालुक्यातील चिंचघर, पोसरे, सापिर्ली, चोरवणे, सापर्ली देऊळवाडी, कातकर वाडी, साखर, कासई, धामनंद, कावळे, तळवट, पाली, खोपी, शिरगांव, धामनंद, चोरवणेमधील सुतारवाडी, उतेकरवाडी, डांगेवाडी, सार्पिली आणि पोसरे गावातील कातकरी वाडी, चिपळूण, दळवटणे, हिंगवलेवाडी, पेढे, बहादूरशेख नाका, कलबस्ते, शंकरवाडी, खेर्डी, सती, काना पिंपरी, खडपोली, गानेखडपोली येथील नदीपात्रातील धनगर व कातकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. साहित्य वाटपासह धामनंद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सदानंद जाधव, डॉ. भगवान गायकवाड, डॉ. दिगंबर वडजे, डॉ. संपदा जाधव, संजय काटकर यांनी सुमारे 95 ग्रामस्थांची तपासणी केली. शुगर तपासणीसह अन्य तपासण्या करीत त्यांना मोफत औषधे ही दिली.

या पुरग्रस्त भागामध्ये तीन दिवस राहून पत्रकार दिलीप शिंदे, संतोष शिंदे, रमाई ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शशी गमरे, अ‍ॅड. राणू गमरे, विश्‍वास शिंदे, विकास माहिमकर, सचिन झंझाड, संतोष शेलार, रोहन खाडे यांनी ग्रामस्थांना मदत पोहचवली. तसेच धामनंद ग्रामपंचायत सदस्य संभाजी उतेकर यांनी मदत केली.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरRainपाऊसlandslidesभूस्खलन