शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर

By संदीप प्रधान | Updated: January 1, 2024 12:28 IST

ठाणे शहरासमोरील आरोग्य व वाहतूक कोंडी या समस्या दिवसागणिक जटिल होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत व प्रस्तावित आहेत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे शहरासमोरील आरोग्य व वाहतूक कोंडी या समस्या दिवसागणिक जटिल होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत व प्रस्तावित आहेत. परंतु, ते पूर्णत्वाला जायला किमान दोन ते दहा वर्षे लागणार आहेत. या काळात ठाण्याची वाढणारी लोकसंख्या, वाहने आणि पर्यायाने दोन्ही आघाड्यांवर गडद होणारी आव्हाने यांचा विचार करता केलेल्या उपाययोजना तोकड्या ठरतील, असेच चित्र आहे.कोरोनामुळे ठाणेकरांना आपली आरोग्य व्यवस्था किती तोकडी आहे, याचा अंदाज आला. मुंबई परिसरात महापालिका व सरकारी रुग्णालये असल्याने मुंबईत कोरोनाचा सामना करणे काही अंशी शक्य झाले. ठाण्याचा विचार केला तर जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिकेचे कळवा येथील हॉस्पिटल, सुमारे ३० दवाखाने, सहा प्रसूती केंद्र व काही मोजके आपले दवाखाने अशी अत्यंत तोकडी व्यवस्था उपलब्ध आहे. ठाण्यात ही स्थिती आहे तर जिल्ह्यातील अन्य शहरांमधील आरोग्य व्यवस्थेबद्दल न बोललेच बरे. कोरोनानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला. हे काम वेगात सुरू आहे. ‘जितो’मार्फत कर्करोग रुग्णालय उभे राहत आहेत. त्यामुळे मुंबईतील टाटा रुग्णालयावरील ताण कमी होईल. महापालिकेचे कळवा रुग्णालय ५०० खाटांचे आहे. त्याची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्याकरिता सरकारने १५० कोटी रुपये निधी दिला आहे. परंतु, या रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे ते पाडून नव्याने बांधावे लागेल. साहजिकच सध्या शासकीय रुग्णालय पाडून नवे बांधले जात असताना महापालिकेचे रुग्णालय पाडता येणार नाही. त्यामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहिल्यावर कळवा रुग्णालयाचे काम सुरू होईल. याखेरीज महावीर जैन हॉस्पिटल व किसन नगर येथील गंगूबाई शिंदे रुग्णालय अशा सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा फुले योजनेत तेथे गोरगरिबांवर उपचार केले जातात. वाहतूक कोंडीचा ग्रह ठाणेकरांच्या कुंडलीतून जात नाही. ठाण्यात माणशी एक वाहन आहे. येथील टॉवरमध्ये एकेका कुटुंबाकडे दोन व त्यापेक्षा जास्त मोटारी आहेत. ठाणे जिल्ह्यातील एकाही शहरात मुंबईत जशी बेस्टची बससेवा आहे, तशी बससेवा नाही. जवळपास २५ ते ३० लाख लोकसंख्येकरिता ठाण्यात केवळ ३०० सार्वजनिक बसगाड्या आहेत. त्यामुळे रिक्षा, खासगी बसगाड्या यांच्या मनमानी कारभारावर लोकांना विसंबून राहावे लागते. गायमुख-भिवंडी तसेच वडाळा-कासारवडवली हे मेट्रो मार्ग सुरू झाले तर घोडबंदरची वाहतूक कोंडी काही अंशी नक्की सुटेल. परंतु, त्याला किमान तीन वर्षे लागतील. ज्ञानसाधना कॉलेजच्या मागे नवे ठाणे रेल्वेस्थानक उभे राहत आहे. ते उभे राहिले तर सध्याची गर्दी काही अंशी कमी होईल. नव्या स्थानकात उतरून प्रवासी मेट्रोने घोडबंदर व बोरीवलीच्या दिशेने जातील. ठाण्यातील रस्त्यांलगतचे सर्व्हिस रोड बंद करून दोन्ही बाजूला पाच-पाच लेनचे रस्ते उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा भूमिगत मार्ग सुरू झाला तर ठाण्याहून बोरीवलीकडे होणारी वाहतूक सुकर होईल. हा मार्ग २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलTrafficवाहतूक कोंडीpollutionप्रदूषण