शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हयातील कोविड रुग्णालयांमध्ये ९७९७ बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:51 IST

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. सध्या नवी मुंबई वगळता जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरुमिशन झिरो अंतर्गत ठाणे महापालिकेने घरोघरी राबविली तपासणी मोहीम

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे सध्या जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने चेस द व्हायरस तसेच मिशन झिरो अंतर्गत घरोघरी आरोग्य सेविकांच्या मदतीने सर्व्हेक्षण आणि तपासणी मोहीम राबविली. त्याचबरोबर मीरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या चार महापालिकांसह कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांच्या क्षेत्रातही ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अंतर्गत मोठया प्रमाणात जेष्ठ रुग्णांची तपासणी, सर्व्हेक्षण आणि कोविड निदान करण्यात आले. वेळेत निदान आणि उपचार करणे सोपे गेल्यामुळेच जिल्हाभर रुग्णांची संख्या आता झपाटयाने कमी होत आहे.सध्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार हजार ४३४ बेडची संख्या असूनही दोन हजार ५०९ रिकामे बेड आहेत. उल्हासनगरमध्ये १२५० एकूण बेड असून ८०० बेड रिकामे आहेत. मीरा भार्इंदरमध्ये २७६ रुग्णांवर उपचार सुरु असून १२३९ बेड रिकामे आहेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये ९२९ रुग्णांवर उपचार सुरु असून तीन हजार ४३४ बेड रिकामे आहेत. भिवंडीत सध्या २३ रुग्णांवर उपचार सुरु असून रिकाम्या बेडची संख्याही मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ जिल्हयातील आरोग्य यंत्रणा तसेच महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणेतील सुविधा वाढवून कोरोना रुग्णांना वेळेत उपचार दिले. मास्क लावणे, सोशल डिस्टन्स, आणि स्वच्छता या त्रिसुत्रीची जनजागृती केली. कमी होणारी रुग्णसंख्या ही समाधानाची बाब आहे. परंतू, आगामी दिवाळी सण तसेच आता सुरु झालेले रेस्टॉरन्ट, सिनेमागृह, नाटयगृह आणि मॉल या सर्वच ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. तरच कोरोनावर पूर्णपणे मात करता येईल.’’राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य