शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

ठाणे जिल्हयातील कोविड रुग्णालयांमध्ये ९७९७ बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:51 IST

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. सध्या नवी मुंबई वगळता जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरुमिशन झिरो अंतर्गत ठाणे महापालिकेने घरोघरी राबविली तपासणी मोहीम

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे सध्या जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने चेस द व्हायरस तसेच मिशन झिरो अंतर्गत घरोघरी आरोग्य सेविकांच्या मदतीने सर्व्हेक्षण आणि तपासणी मोहीम राबविली. त्याचबरोबर मीरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या चार महापालिकांसह कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांच्या क्षेत्रातही ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अंतर्गत मोठया प्रमाणात जेष्ठ रुग्णांची तपासणी, सर्व्हेक्षण आणि कोविड निदान करण्यात आले. वेळेत निदान आणि उपचार करणे सोपे गेल्यामुळेच जिल्हाभर रुग्णांची संख्या आता झपाटयाने कमी होत आहे.सध्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार हजार ४३४ बेडची संख्या असूनही दोन हजार ५०९ रिकामे बेड आहेत. उल्हासनगरमध्ये १२५० एकूण बेड असून ८०० बेड रिकामे आहेत. मीरा भार्इंदरमध्ये २७६ रुग्णांवर उपचार सुरु असून १२३९ बेड रिकामे आहेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये ९२९ रुग्णांवर उपचार सुरु असून तीन हजार ४३४ बेड रिकामे आहेत. भिवंडीत सध्या २३ रुग्णांवर उपचार सुरु असून रिकाम्या बेडची संख्याही मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ जिल्हयातील आरोग्य यंत्रणा तसेच महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणेतील सुविधा वाढवून कोरोना रुग्णांना वेळेत उपचार दिले. मास्क लावणे, सोशल डिस्टन्स, आणि स्वच्छता या त्रिसुत्रीची जनजागृती केली. कमी होणारी रुग्णसंख्या ही समाधानाची बाब आहे. परंतू, आगामी दिवाळी सण तसेच आता सुरु झालेले रेस्टॉरन्ट, सिनेमागृह, नाटयगृह आणि मॉल या सर्वच ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. तरच कोरोनावर पूर्णपणे मात करता येईल.’’राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य