शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ठाणे जिल्हयातील कोविड रुग्णालयांमध्ये ९७९७ बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:51 IST

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. सध्या नवी मुंबई वगळता जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरुमिशन झिरो अंतर्गत ठाणे महापालिकेने घरोघरी राबविली तपासणी मोहीम

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिकांनीही कोविड सेंटर आणि रुग्णालयांच्या मार्फतीने केलेल्या उपचारांना आता मोठे यश येत आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे सध्या जिल्हाभर अवघ्या तीन हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून तब्बल नऊ हजार ७९७ बेड रिकामेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेने चेस द व्हायरस तसेच मिशन झिरो अंतर्गत घरोघरी आरोग्य सेविकांच्या मदतीने सर्व्हेक्षण आणि तपासणी मोहीम राबविली. त्याचबरोबर मीरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या चार महापालिकांसह कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांच्या क्षेत्रातही ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अंतर्गत मोठया प्रमाणात जेष्ठ रुग्णांची तपासणी, सर्व्हेक्षण आणि कोविड निदान करण्यात आले. वेळेत निदान आणि उपचार करणे सोपे गेल्यामुळेच जिल्हाभर रुग्णांची संख्या आता झपाटयाने कमी होत आहे.सध्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार हजार ४३४ बेडची संख्या असूनही दोन हजार ५०९ रिकामे बेड आहेत. उल्हासनगरमध्ये १२५० एकूण बेड असून ८०० बेड रिकामे आहेत. मीरा भार्इंदरमध्ये २७६ रुग्णांवर उपचार सुरु असून १२३९ बेड रिकामे आहेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये ९२९ रुग्णांवर उपचार सुरु असून तीन हजार ४३४ बेड रिकामे आहेत. भिवंडीत सध्या २३ रुग्णांवर उपचार सुरु असून रिकाम्या बेडची संख्याही मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ जिल्हयातील आरोग्य यंत्रणा तसेच महापालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणेतील सुविधा वाढवून कोरोना रुग्णांना वेळेत उपचार दिले. मास्क लावणे, सोशल डिस्टन्स, आणि स्वच्छता या त्रिसुत्रीची जनजागृती केली. कमी होणारी रुग्णसंख्या ही समाधानाची बाब आहे. परंतू, आगामी दिवाळी सण तसेच आता सुरु झालेले रेस्टॉरन्ट, सिनेमागृह, नाटयगृह आणि मॉल या सर्वच ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. तरच कोरोनावर पूर्णपणे मात करता येईल.’’राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य