शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्याकडे थकली ९० कोटींची पाणीपट्टी; मुंबई पालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी

By सुरेश लोखंडे | Updated: August 2, 2023 13:45 IST

...त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे.

ठाणे : बृहन्मुंबईसह ठाणे या स्मार्ट शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीसाठ्याकडे या दोन्ही शहरांचे लक्ष लागून असते; मात्र त्यातील पाणी वापराच्या मनमानीला आळा घालणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे.

बृहन्मुंबईपाठोपाठ ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यातील या वाढत्या लोकसंख्येला आजही भातसा या मोठ्या जलाशयातून रोज पाणीपुरवठा होत आहे. त्यात पाण्याचा मनमानी वापर नियंत्रणात आणणे मुंबई, ठाणे या महापालिकांना आजपर्यंत शक्य झाले नाही. नियमित मंजूर पाणीपुरवठ्याच्या तुलनेत या दोन्ही महापालिकांमध्ये दुप्पट, चौपट पाण्याचा वापर होत असल्याचे निरीक्षण भातसा धरणाच्या प्रशासनाने नोंद केले आहे. त्यातुलनेत पाणीपट्टीची आकारणीही केली जाते; पण या बिलाचा भरणा वेळेत होत नाही. त्यातून वादग्रस्त ठरलेल्या या पाणीपट्टीची मुंबई महापालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी रखडली असून ठाणे महापालिकेकडे ३० कोटी २३ लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

महापालिकांकडून केला जातो दुप्पट, चौपट पाण्याचा वापर शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; पण या निकषाच्या दुप्पट, चौपट पाण्याचा वापर या महापालिकांमधील नागरिकांकडून होत आहे. 

वाढीव पाणीवापरानुसार भातसा धरण व्यवस्थापन पाणीपट्टीची आकारणी कराराप्रमाणे करीत आहे; परंतु ही वाढीव पाणीपट्टीची रक्कम अन्यायकारक असल्याच्या वादातून या दोन्ही महापालिकांकडे ही ९० कोटी ५३ लाखांची रक्कम रखडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

वादातून मार्ग काढण्यासाठी  मंत्रालयात यावर वेळोवेळी चर्चाही झाली आहे; पण त्यातून समाधानकारक तोडगा निघालेला नसल्यामुळे भातसाच्या पाणीपट्टीची रक्कम रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून ऐकविले जात आहे. 

थकीत रक्कमच भरली जात नाहीमहापालिकांशी झालेल्या करारानुसारच पाणीबिलाची आकारणी केली जात आहे. त्यानुसार, ही थकीत रक्कम काही अंशी एकत्रित करून बिल महापालिकांना दिले जात आहे; पण नियमित बिलाची रक्कम भरणाऱ्या या महापालिकांकडून थकीत रक्कम भरली जात नसल्यामुळे आजपर्यंत ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाWaterपाणी