शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मुंबई, ठाण्याकडे थकली ९० कोटींची पाणीपट्टी; मुंबई पालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी

By सुरेश लोखंडे | Updated: August 2, 2023 13:45 IST

...त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे.

ठाणे : बृहन्मुंबईसह ठाणे या स्मार्ट शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीसाठ्याकडे या दोन्ही शहरांचे लक्ष लागून असते; मात्र त्यातील पाणी वापराच्या मनमानीला आळा घालणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे.

बृहन्मुंबईपाठोपाठ ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यातील या वाढत्या लोकसंख्येला आजही भातसा या मोठ्या जलाशयातून रोज पाणीपुरवठा होत आहे. त्यात पाण्याचा मनमानी वापर नियंत्रणात आणणे मुंबई, ठाणे या महापालिकांना आजपर्यंत शक्य झाले नाही. नियमित मंजूर पाणीपुरवठ्याच्या तुलनेत या दोन्ही महापालिकांमध्ये दुप्पट, चौपट पाण्याचा वापर होत असल्याचे निरीक्षण भातसा धरणाच्या प्रशासनाने नोंद केले आहे. त्यातुलनेत पाणीपट्टीची आकारणीही केली जाते; पण या बिलाचा भरणा वेळेत होत नाही. त्यातून वादग्रस्त ठरलेल्या या पाणीपट्टीची मुंबई महापालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी रखडली असून ठाणे महापालिकेकडे ३० कोटी २३ लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

महापालिकांकडून केला जातो दुप्पट, चौपट पाण्याचा वापर शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; पण या निकषाच्या दुप्पट, चौपट पाण्याचा वापर या महापालिकांमधील नागरिकांकडून होत आहे. 

वाढीव पाणीवापरानुसार भातसा धरण व्यवस्थापन पाणीपट्टीची आकारणी कराराप्रमाणे करीत आहे; परंतु ही वाढीव पाणीपट्टीची रक्कम अन्यायकारक असल्याच्या वादातून या दोन्ही महापालिकांकडे ही ९० कोटी ५३ लाखांची रक्कम रखडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

वादातून मार्ग काढण्यासाठी  मंत्रालयात यावर वेळोवेळी चर्चाही झाली आहे; पण त्यातून समाधानकारक तोडगा निघालेला नसल्यामुळे भातसाच्या पाणीपट्टीची रक्कम रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून ऐकविले जात आहे. 

थकीत रक्कमच भरली जात नाहीमहापालिकांशी झालेल्या करारानुसारच पाणीबिलाची आकारणी केली जात आहे. त्यानुसार, ही थकीत रक्कम काही अंशी एकत्रित करून बिल महापालिकांना दिले जात आहे; पण नियमित बिलाची रक्कम भरणाऱ्या या महापालिकांकडून थकीत रक्कम भरली जात नसल्यामुळे आजपर्यंत ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाWaterपाणी