शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:32 AM

भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली.

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली. अपक्षांमधील काही उमेदवार आपल्या परिसरातील मते खाण्यासाठी पुढे आलेले दिसून येतात, तर काही पक्ष आपण कोणत्या स्थानी आहोत, याची पडताळणी मतांमधून करतात. अपक्षांना एकूण मतांच्या १६ टक्केही मते मिळत नसल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होते. मात्र, त्यांच्यामुळे मतांचे विभाजन होत असल्याचे पाहायला मिळते.२००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर भिवंडी मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर, लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या २००९ च्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार उभे होते. त्यावेळी एकूण मतदान पाच लाख ८४ हजार २६३ झाले. त्यानुसार, अपेक्षित मते न मिळाल्याने १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. म्हणजेच, ८१ टक्के जणांचे डिपॉझिट जप्त झाले. २०१४ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत एकूण १३ जण रिंगणात होते. त्यावेळी एकूण आठ लाख ७५ हजार ६०५ मतदान झाले. त्यापैकी अपेक्षित मतदान न झाल्याने ११ उमेदवारांचे म्हणजेच ८४ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे असतानाही २०१९ मध्ये होणाºया या निवडणुकीत उमेदवारांची संख्या १५ झाली आहे.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते व वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.85% टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत असल्याची आतापर्यंतची सरासरी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी