शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:32 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली.

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली. अपक्षांमधील काही उमेदवार आपल्या परिसरातील मते खाण्यासाठी पुढे आलेले दिसून येतात, तर काही पक्ष आपण कोणत्या स्थानी आहोत, याची पडताळणी मतांमधून करतात. अपक्षांना एकूण मतांच्या १६ टक्केही मते मिळत नसल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होते. मात्र, त्यांच्यामुळे मतांचे विभाजन होत असल्याचे पाहायला मिळते.२००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर भिवंडी मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर, लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या २००९ च्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार उभे होते. त्यावेळी एकूण मतदान पाच लाख ८४ हजार २६३ झाले. त्यानुसार, अपेक्षित मते न मिळाल्याने १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. म्हणजेच, ८१ टक्के जणांचे डिपॉझिट जप्त झाले. २०१४ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत एकूण १३ जण रिंगणात होते. त्यावेळी एकूण आठ लाख ७५ हजार ६०५ मतदान झाले. त्यापैकी अपेक्षित मतदान न झाल्याने ११ उमेदवारांचे म्हणजेच ८४ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे असतानाही २०१९ मध्ये होणाºया या निवडणुकीत उमेदवारांची संख्या १५ झाली आहे.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते व वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.85% टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत असल्याची आतापर्यंतची सरासरी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी