शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

‘बारवी’त ८३ टक्के, तर ‘आंध्रा’त ५९ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:11 IST

या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि ठाणे शहराच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात शुक्रवारी पावसाचा जोर कमी आहे. या धरणात सध्या ५९ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.उल्हास नदीवरील शहाडजवळील मोहने बंधारा येथून स्टेम प्राधिकरणाद्वारे मनपा, भिवंडीच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीला कर्जतजवळ भीवपुरी येथील टाटाच्या मालकीच्या या आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. यंदा अजून केवळ ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आंध्रात धरणात पाणीसाठा तयार होईल. आजमितीस २०२ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. बारवी धरण भरून वाहण्याकरिता त्यामध्ये अवघा १.९५ मीटर साठा होणे बाकी आहे.बारवी धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ते लवकरच भरण्याचे चिन्हे दिसत आहे. शुक्रवारी या धरण परिसरात सरासरी ८६ मि.मी. पाऊस पडला. मोडकसागर १०० टक्के तर तानसा ९९.५८ टक्के भरले आहे. याशिवाय सर्वात मोठे भातसा धरण ९२.६९ टक्के भरले आहे. या धरणात शुक्रवारी ७२ मि.मी. पाऊस झाला.जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शहरी भागात सरासरी ४८.६ मि.मी. पाऊस झाला. ठाण्यात १७.४ मि.मी., कल्याणमध्ये ६८ मि.मी., मुरबाड ४९ मि.मी., भिवंडी ३८.६ मि.मी., शहापूर ६८.६ मि.मी. पाऊस झाला आहे.