शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मनपासह जिल्ह्यात ८१९३ मुले शाळाबाह्य

By admin | Updated: April 15, 2016 01:28 IST

‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. कोणतेही रेकॉर्ड नसताना त्यांना दाखल केल्याची नोंदही होत आहे.

- सुरेश लोखंडे,  ठाणे‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. कोणतेही रेकॉर्ड नसताना त्यांना दाखल केल्याची नोंदही होत आहे. प्रत्यक्षात मात्र आठ हजार १९३ मुले अद्यापही शाळेत नसल्याचे निदर्शनात आले आहे. यात तीन हजार ७५६ मुलींचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष संपले असून दोन महिन्यांनी नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार आहे. प्रारंभापासून या शाळाबाह्य मुलांना जवळच्या शाळेत गांभीर्याने सामावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु जुलै, आॅगस्ट, डिसेंबर आणि जानेवारीअखेरपर्यंत सर्व्हे केलेली मुले शाळेत दाखल केल्याचे भासवून जबाबदारी पूर्ण केल्याचे शिक्षण विभाग भासवत आहे. प्रत्यक्षात मात्र ही मुले आजपर्यंतही वर्गातच बसली नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील या शाळाबाह्य मुलांचा चार वेळा शोध घेण्यात आला. या वेळी सहा महापालिका क्षेत्रांतून सहा हजार ७७५ मुलांची नोंद झाली आहे. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील तालुक्यांच्या गावखेड्यांतील एक हजार ४१८ मुले शाळेत नसल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यात ७१७ मुले आणि ७०१ मुलींचा समावेश आहे. या आठ हजार १९३ मुलांपैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना तर जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील चार हजार ३८७ मुले शहरी भागातील शाळांमध्ये दाखल झालेले नाहीत. तर, गावखेड्यांतील २१४ मुले शाळेत नाहीत. परंतु, फेब्रुवारीपर्यंत सर्व मुले त्यांच्या जवळच्या शाळांमध्ये दाखल केले आहेत. मात्र, सवयीप्रमाणे ते शाळेत न बसता उनाडपणा करून गैरहजर राहत असल्याची पळवाट काही शिक्षकांकडून नमूद केली जात आहे. यावरून, ‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्याकडे सुयोग्य पद्धतीने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील शाळाबाह्य मुले महापालिका मुलेमुलीठाणे मनपा०७८१०७३८उल्हासनगर०१७२०१५६भिवंडी१३३५१००९कल्याण०३५७०२३३मीरा-भार्इंदर०३२६०२८५नवी मुंबई०७४९०६५४जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील मुलेतालुकामुलेमुलीभिवंडी१९४१९९कल्याण०८७०९१मुरबाड०६७०५८शहापूर०२३४०२२१अंबरनाथ०१३५०१३२