शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ठाण्याला ८०० काेटी आले, मग गेले कुठे? आ. संजय केळकर यांनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:14 IST

पालिकेत कुठेही गैरव्यवहार नसून सर्व हिशेब लागणार असल्याचा दावा

ठाणे : गेल्या पाच वर्षांत ठाणे पालिकेने ऑडिट रिपोर्टच शासनाला सादर केलेला नाही. २०० काेटींचे निरनिराळे आक्षेप आहेत. निधीचा संशयित वापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर काेणतीही कारवाईच नाही. नगरविकास विभागाकडून पालिकेत सुमारे ८०० काेटींचा निधी आला. मग ताे जाताे कुठे? असा सवालच आ. संजय केळकर यांनी केला आहे. तर हा हिशेब लागणारच नाही, असा टाेला शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. दरम्यान, पालिकेत कुठेही गैरव्यवहार नसून सर्व हिशेब लागणार असल्याचा दावा शिंदेसेनेच खा. नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

काेपरीतील मल:निसारण प्रकल्पाला अलीकडेच आ. केळकर यांनी भेट दिली हाेती. मल:प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी, बायो गॅसद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीने प्रकाशझोतात आला.  तीन वर्षांत या कामाची एकही विट लागली नसताना कंत्राटदाराला दोन कोटी दिल्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी केला आहे. याच्या  चौकशीची मागणीही केळकर यांनी केली 

पाच वर्षांत ऑडिटच नाही

पाच वर्षांत पालिकेने ऑडिटच केले नाही.  प्रत्येक आठवड्याचे ऑडिट करतात आणि ते स्थायी समितीकडून मंजूर करतात. आता स्थायी समिती नाही. 

शिस्त आणि कार्यक्षमता येण्यासाठीच पालिकेचे लेखापरीक्षण आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी व्यक्त केले. लेखापरीक्षकांनी ७,६०५ आक्षेप घेतले आहेत. सुमारे तीन अब्ज ३७ काेटी ५३ लाख रुपयांचा हिशेबच मिळत नसून अनेक आक्षेप असल्याने आयुक्तांपर्यंत हा ऑडिट रिपाेर्ट येताे की नाही, असा आराेप देशपांडे यांनी केला आहे.

महापालिकेत कुठेही गैरव्यवहार, अनियमितता नाही. त्यामुळे सर्व हिशेब लागेल - नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा