शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:41 IST

गेल्या वर्षी भरले होते १00 टक्के

सुरेश लोखंडे ठाणे : पाणलोट क्षेत्रातह पाऊस कमी झाल्यामुळे धरणांच्यापाणीसाठा वाढण्यास यंदा विलंब झाला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के भरले होते. पण, यंदा मात्र केवळ ६३ टक्के साठा तयार झाला आहे. मात्र, या वर्षी बारवीचा पाणीसाठा चार मीटरने वाढणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच दरवाजेही बंद करावे लागणार आहेत. याच्या जय्यत तयारीस अनुसरून पाणलोट क्षेत्रातील गावपाड्यांच्या स्थलांतरासह निवास व्यवस्थेचीदेखील काळजी घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात नेहमी ६८.६० मीटर पाणी साठा केला जात आहे. परंतु, यंदापासून या धरणात चार मीटरने वाढीव म्हणजे ७२.६० मीटर पाणीसाठा होणार आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १०१.३८ टक्के पाणीसाठा तयार होता. यंदा केवळ जुन्या क्षमतेनुसार ६३.३६ टक्के साठा तयार झाला असून वाढीव पाणीसाठ्यास अनुसरून बारवीत आतापर्यंत ४३.५८ टक्के पाणी साठवण्यात आले आहे.

घरभाड्यासह उदरनिर्वाह भत्त्याचेही वाटपधरणात पाणीसाठा वाढणार असल्यामुळे या रहिवाशांच्या निवास व्यवस्थेची समस्या उद्भवणार आहे. यावर उपाययोजना म्हणून या गावकऱ्यांना सहा हजार रूपये प्रती महिना घरभाडे मंजूर केले आहे. एवढेच नव्हे तर ११ महिन्याचे ६६ हजार रूपये घर भाडे आगाऊ देऊन उदरनिर्वाहसाठी प्रत्येक कुटुंबाला ७१ हजार ५०० रूपये भत्ता दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या रहिवाशांच्या घरासाठी भूखंडही मंजूर झाले आहेत. पाच कुटूंब संख्या असलेल्यांसाठी ३७० मीटर तर पाच पेक्षा जास्त असलेल्यांसाठी ७४० मीटर भूखंड मंजूर होता. पण या रहिवाश्यांच्या मागणीस अनुसरून या घराच्या भूखंडा ऐवजी पाच जणांच्या कुटुंबाच्या घरासाठी सहा लाख ६५ हजार तर पाच पेक्षा जास्त जणांच्या घरासाठी १३ लाख ३० हजार रूपये वाटप केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कातकोलीच्या पाड्यांच्या पुनर्वसनात अडसरवाढीव पाणीसाठ्यासाठी जल समाधी मिळणाºया सात गावपाड्यांचे पुनर्वसन केले जात आहे. यात शंभर टक्के बुडणाºया तोडली गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मिटला आहे. गावठाण विकसित करून पुनर्वसन झाले आहे. याशिवाय कातकोलीच्या मुरगवाडी, गुरूवाडी, देवपाडा आण जांभूळवाडी चार चार पाड्यांच्या नागरिकांना पैसे वाटप होऊन त्यांच्या निवास व्यवस्थेचीदेखील व्यवस्था पूर्ण झाल्याचे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. परंतु, कातकोलीच्या या चार पाड्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या प्लॉट अलॉटमेंटसाठी मात्र विलंब झालेला आहे. सुमारे ३३० कुटूंब असलेल्या या पाड्यांची अंदाजे एक हजार ५०० लोकसंख्या आहे.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी