शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:41 IST

गेल्या वर्षी भरले होते १00 टक्के

सुरेश लोखंडे ठाणे : पाणलोट क्षेत्रातह पाऊस कमी झाल्यामुळे धरणांच्यापाणीसाठा वाढण्यास यंदा विलंब झाला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के भरले होते. पण, यंदा मात्र केवळ ६३ टक्के साठा तयार झाला आहे. मात्र, या वर्षी बारवीचा पाणीसाठा चार मीटरने वाढणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच दरवाजेही बंद करावे लागणार आहेत. याच्या जय्यत तयारीस अनुसरून पाणलोट क्षेत्रातील गावपाड्यांच्या स्थलांतरासह निवास व्यवस्थेचीदेखील काळजी घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात नेहमी ६८.६० मीटर पाणी साठा केला जात आहे. परंतु, यंदापासून या धरणात चार मीटरने वाढीव म्हणजे ७२.६० मीटर पाणीसाठा होणार आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १०१.३८ टक्के पाणीसाठा तयार होता. यंदा केवळ जुन्या क्षमतेनुसार ६३.३६ टक्के साठा तयार झाला असून वाढीव पाणीसाठ्यास अनुसरून बारवीत आतापर्यंत ४३.५८ टक्के पाणी साठवण्यात आले आहे.

घरभाड्यासह उदरनिर्वाह भत्त्याचेही वाटपधरणात पाणीसाठा वाढणार असल्यामुळे या रहिवाशांच्या निवास व्यवस्थेची समस्या उद्भवणार आहे. यावर उपाययोजना म्हणून या गावकऱ्यांना सहा हजार रूपये प्रती महिना घरभाडे मंजूर केले आहे. एवढेच नव्हे तर ११ महिन्याचे ६६ हजार रूपये घर भाडे आगाऊ देऊन उदरनिर्वाहसाठी प्रत्येक कुटुंबाला ७१ हजार ५०० रूपये भत्ता दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या रहिवाशांच्या घरासाठी भूखंडही मंजूर झाले आहेत. पाच कुटूंब संख्या असलेल्यांसाठी ३७० मीटर तर पाच पेक्षा जास्त असलेल्यांसाठी ७४० मीटर भूखंड मंजूर होता. पण या रहिवाश्यांच्या मागणीस अनुसरून या घराच्या भूखंडा ऐवजी पाच जणांच्या कुटुंबाच्या घरासाठी सहा लाख ६५ हजार तर पाच पेक्षा जास्त जणांच्या घरासाठी १३ लाख ३० हजार रूपये वाटप केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कातकोलीच्या पाड्यांच्या पुनर्वसनात अडसरवाढीव पाणीसाठ्यासाठी जल समाधी मिळणाºया सात गावपाड्यांचे पुनर्वसन केले जात आहे. यात शंभर टक्के बुडणाºया तोडली गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मिटला आहे. गावठाण विकसित करून पुनर्वसन झाले आहे. याशिवाय कातकोलीच्या मुरगवाडी, गुरूवाडी, देवपाडा आण जांभूळवाडी चार चार पाड्यांच्या नागरिकांना पैसे वाटप होऊन त्यांच्या निवास व्यवस्थेचीदेखील व्यवस्था पूर्ण झाल्याचे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. परंतु, कातकोलीच्या या चार पाड्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या प्लॉट अलॉटमेंटसाठी मात्र विलंब झालेला आहे. सुमारे ३३० कुटूंब असलेल्या या पाड्यांची अंदाजे एक हजार ५०० लोकसंख्या आहे.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी