शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:41 IST

गेल्या वर्षी भरले होते १00 टक्के

सुरेश लोखंडे ठाणे : पाणलोट क्षेत्रातह पाऊस कमी झाल्यामुळे धरणांच्यापाणीसाठा वाढण्यास यंदा विलंब झाला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के भरले होते. पण, यंदा मात्र केवळ ६३ टक्के साठा तयार झाला आहे. मात्र, या वर्षी बारवीचा पाणीसाठा चार मीटरने वाढणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच दरवाजेही बंद करावे लागणार आहेत. याच्या जय्यत तयारीस अनुसरून पाणलोट क्षेत्रातील गावपाड्यांच्या स्थलांतरासह निवास व्यवस्थेचीदेखील काळजी घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात नेहमी ६८.६० मीटर पाणी साठा केला जात आहे. परंतु, यंदापासून या धरणात चार मीटरने वाढीव म्हणजे ७२.६० मीटर पाणीसाठा होणार आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १०१.३८ टक्के पाणीसाठा तयार होता. यंदा केवळ जुन्या क्षमतेनुसार ६३.३६ टक्के साठा तयार झाला असून वाढीव पाणीसाठ्यास अनुसरून बारवीत आतापर्यंत ४३.५८ टक्के पाणी साठवण्यात आले आहे.

घरभाड्यासह उदरनिर्वाह भत्त्याचेही वाटपधरणात पाणीसाठा वाढणार असल्यामुळे या रहिवाशांच्या निवास व्यवस्थेची समस्या उद्भवणार आहे. यावर उपाययोजना म्हणून या गावकऱ्यांना सहा हजार रूपये प्रती महिना घरभाडे मंजूर केले आहे. एवढेच नव्हे तर ११ महिन्याचे ६६ हजार रूपये घर भाडे आगाऊ देऊन उदरनिर्वाहसाठी प्रत्येक कुटुंबाला ७१ हजार ५०० रूपये भत्ता दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या रहिवाशांच्या घरासाठी भूखंडही मंजूर झाले आहेत. पाच कुटूंब संख्या असलेल्यांसाठी ३७० मीटर तर पाच पेक्षा जास्त असलेल्यांसाठी ७४० मीटर भूखंड मंजूर होता. पण या रहिवाश्यांच्या मागणीस अनुसरून या घराच्या भूखंडा ऐवजी पाच जणांच्या कुटुंबाच्या घरासाठी सहा लाख ६५ हजार तर पाच पेक्षा जास्त जणांच्या घरासाठी १३ लाख ३० हजार रूपये वाटप केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कातकोलीच्या पाड्यांच्या पुनर्वसनात अडसरवाढीव पाणीसाठ्यासाठी जल समाधी मिळणाºया सात गावपाड्यांचे पुनर्वसन केले जात आहे. यात शंभर टक्के बुडणाºया तोडली गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मिटला आहे. गावठाण विकसित करून पुनर्वसन झाले आहे. याशिवाय कातकोलीच्या मुरगवाडी, गुरूवाडी, देवपाडा आण जांभूळवाडी चार चार पाड्यांच्या नागरिकांना पैसे वाटप होऊन त्यांच्या निवास व्यवस्थेचीदेखील व्यवस्था पूर्ण झाल्याचे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. परंतु, कातकोलीच्या या चार पाड्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या प्लॉट अलॉटमेंटसाठी मात्र विलंब झालेला आहे. सुमारे ३३० कुटूंब असलेल्या या पाड्यांची अंदाजे एक हजार ५०० लोकसंख्या आहे.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी