शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

५७८ शाळा शंभर नंबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून मुंबई विभागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून मुंबई विभागात ठाणे जिल्हा चौथ्या स्थानी आहे. जिल्ह्यातील एकदोन नव्हे तर तब्बल ५७८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सर्वाधिक आहेत. ठाण्यातील एकूण २६१ पैकी १४१ म्हणजे अर्ध्याहून जास्त शाळांनी शंभर नंबरी यश मिळवले आहे.जिल्ह्यातील १०० टक्के यश मिळवलेल्या शाळांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ११४ शाळा आहेत. नवी मुंबईतील ७६, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रतील ६८, अंबरनाथ-बदलापुरातील ५३, भिवंडी तालुक्यातील ४३, शहापुरातील २६, उल्हासनगरमधील २४, कल्याण ग्रामीण तालुक्यातील १८, तर मुरबाडमधील १५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचे निकालही नव्वदीपार लागले आहेत. जिल्ह्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा निकाल सर्वाधिक ९७.९५ टक्के, तर भिवंडी मनपा क्षेत्राचा निकाल ९३.८७ टक्के इतका लागला आहे.यंदाचा दहावीचा निकाल हा आतापर्यंतच्या निकालांतील सर्वोच्च निकाल आहे. गेल्या १० वर्षांत आणि त्यामागील निकाल पाहता हा भरघोस निकाल आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. जे उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश न होता त्यांच्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने मार्गदर्शन, समुपदेशन व फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येईल.- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ठाणे जिल्हा परिषद