शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ‘जन की बात’मध्ये ५०० तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

ठाणे : ठाण्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या रविवारी झालेल्या ‘जन की बात’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्याच्या ...

ठाणे : ठाण्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या रविवारी झालेल्या ‘जन की बात’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्याच्या पहिल्याच कार्यक्रमात विविध विभागांच्या ५०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी तक्रारी ऐकून घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

कोरोना काळातील निर्बंधांमुळे सव्वा वर्षाच्या काळात जनसामान्यांच्या समस्या रखडल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून पोकळ आश्वासने, होणारी टोलवाटोलवी आणि महापालिकेतील भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे ‘जन की बात’, ‘तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रमात कोपरी परिसरातील नागरिकांनी केंद्र, राज्य आणि महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबद्दल तक्रारी केल्या. मात्र, त्यातील बहुतांश तक्रारी महापालिकेसंदर्भात होत्या. या समस्या खासदार सहस्रबुद्धे, आमदार डावखरे व आमदार केळकर यांनी ऐकून घेतल्या. तसेच त्यावर संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.