शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ठेक्याचे ५० सुरक्षा रक्षक आता सुरक्षारक्षक मंडळाकडून पुन्हा पालिका सेवेत

By धीरज परब | Updated: January 14, 2024 14:42 IST

आणखी १५० सुरक्षा रक्षक ना मिळणार रोजगार 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत ठेक्यावर असणाऱ्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कमी केल्या नंतर स्थानिकांवर बेरोजगारीची ओढवलेली संक्रांत दूर करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी प्रयत्न चालवले होते . त्यातूनच ठेक्याच्या अनेक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळा तर्फे नोंदणी आदी कार्यवाही करून पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षक पुन्हा पालिका सेवेत दाखल झाले आहेत . 

राज्य शासनाचे पूर्वी पासूनच आदेश होते कि , सुरक्षा रक्षक हे शासनाच्या मान्यता प्राप्त सुरक्षा मंडळाचे नेमण्यात यावेत . परंतु मीरा भाईंदर महापालिकेने असेच अनेक नगरसेवक व काही वादग्रस्त राजकारणी आदींनी अर्थपूर्ण हेतून सातत्याने शासन आदेशाचे उल्लंघन करत खाजगी ठेकेदारा मार्फत सुरक्षा रक्षक घेतले असे आरोप होत होते . प्रत्यक्षात कमी सुरक्षा रक्षक असणे , त्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन , भत्ते न मिळणे आदी अनेक कारणांनी आरोप होत होते  . 

तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाच्या मान्यतेचे असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेऊन काही राजकारणी यांना धक्का दिला . त्या नंतर आलेले आयुक्त संजय काटकर यांनी तर ठेकेदारालाच स्वतःहून काम बंद करण्यास भाग पाडले . कारण सदर ठेकेदार अनेक वर्षां पासून केवळ मुदतवाढीवर असल्याने तसेच विविध कारणांनी कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा होती . 

पालिका सेवेत  मे. सैनिक इंटेलिजन्स अँड सेक्युरिटी प्रा.लि. मार्फत असलेल्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कंत्राट बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला . त्यात स्थानिक सुरक्षा रक्षक सुद्धा संख्येने नाईक होते . दरम्यान सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासह पुढील कार्यवाही बारगळली . 

दुसरीकडे सुरक्षा रक्षकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता ठेकेदार व प्रशासनाने परस्पर सुरक्षा रक्षक कमी केल्याने अनेक स्थानिकांवर बेरोजगारीची पाळी आली . त्यांनी आमदार गीता भरत जैन यांच्याकडे नोकरी मिळावी म्हणून अर्ज केले . आ . जैन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा चालवला होता . पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेण्याची तयारी केल्याने स्थानिकांना संधी मिळणार नाही म्हणून त्यास आ . जैन यांनी विरोध केला . 

अखेर स्थानिक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी करून लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेण्यात यावे ह्या मागणीवर उपमुख्यमंत्री व आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली . त्यामुळे आता स्थानिक बेरोजगार झालेल्या ५० सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळा तर्फे महापालिकेत पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे .

पुन्हा पालिका सेवेत रुजू झालेल्या सुरक्षा रक्षकांनी आ जैन यांची भेट घेऊन आभार मानले .  महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन चे संयुक्त सरचिटणीस ऍड . अजिंक्य भोसले आदी उपस्थित होते . पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळाला असून आणखी १५०  सुरक्षा रक्षकांना सुद्धा टप्या टप्याने पुन्हा सेवेत घेतले जाईल असे आ . जैन यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर