शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...
2
Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना
3
हृदयद्रावक! गोंडस बाळाला जन्म दिला, चेहरा पाहण्याआधी आईने जगाचा निरोप घेतला
4
घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील
5
एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान
6
"..तर तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही!" सुनील शेट्टींनी केलं KL राहुलचं कौतुक, म्हणाले- "त्याचा संघर्ष मी..."
7
"नियतीने थोडी दया दाखवली असती तर...", दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
8
...अन् ते मृत्यूच्या दाढेतून परतले! समुद्रात अडकलेल्या नवी मुंबईतील चार विद्यार्थ्यांची सुटका
9
VIDEO: 'रोहित शर्माला Mumbai Indiansचं कॅप्टन करा', चाहत्याच्या मागणीवर नीता अंबानी म्हणाल्या...
10
लय भारी! अपघातात नवऱ्याने गमावला जीव, शिक्षिकेने बनवलं स्मार्ट हेल्मेट; फीचर्स आहेत कमाल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट; १७ वर्षीय तरुणानं आधी आई वडिलांना संपवलं, मग...
12
बीड जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू
13
अद्भुत अन् अविश्वसनीय : लेझर किरण पडताच वितळतील शत्रूंची ड्रोन अन् विमानेही, लष्कराचं नवं अस्त्र बघितलं का?
14
Chandra Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात चंद्राचे संक्रमण; पाच राशींच्या आयुष्याला देईल सुखाचे वळण!
15
ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल; रूम बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप
16
नाशकात आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजेवर नाचताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मुलींसाठी योग्य घर मिळेना; म्हणाले, ‘समाज दिव्यांगांना दडपून टाकतो’ 
18
"महात्मा गांधींच्या हत्येमध्ये सावरकरांचा काही संबंध नाही", रणदीप हुड्डाचं स्पष्ट मत, म्हणाला-
19
"अजूनही मला त्याची उब जाणवते..", 'अशी ही बनवाबनवी' फेम शंतनूच्या आठवणीत बायकोनं केलं टक्कल
20
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी

ठेक्याचे ५० सुरक्षा रक्षक आता सुरक्षारक्षक मंडळाकडून पुन्हा पालिका सेवेत

By धीरज परब | Updated: January 14, 2024 14:42 IST

आणखी १५० सुरक्षा रक्षक ना मिळणार रोजगार 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत ठेक्यावर असणाऱ्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कमी केल्या नंतर स्थानिकांवर बेरोजगारीची ओढवलेली संक्रांत दूर करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी प्रयत्न चालवले होते . त्यातूनच ठेक्याच्या अनेक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळा तर्फे नोंदणी आदी कार्यवाही करून पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षक पुन्हा पालिका सेवेत दाखल झाले आहेत . 

राज्य शासनाचे पूर्वी पासूनच आदेश होते कि , सुरक्षा रक्षक हे शासनाच्या मान्यता प्राप्त सुरक्षा मंडळाचे नेमण्यात यावेत . परंतु मीरा भाईंदर महापालिकेने असेच अनेक नगरसेवक व काही वादग्रस्त राजकारणी आदींनी अर्थपूर्ण हेतून सातत्याने शासन आदेशाचे उल्लंघन करत खाजगी ठेकेदारा मार्फत सुरक्षा रक्षक घेतले असे आरोप होत होते . प्रत्यक्षात कमी सुरक्षा रक्षक असणे , त्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन , भत्ते न मिळणे आदी अनेक कारणांनी आरोप होत होते  . 

तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाच्या मान्यतेचे असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेऊन काही राजकारणी यांना धक्का दिला . त्या नंतर आलेले आयुक्त संजय काटकर यांनी तर ठेकेदारालाच स्वतःहून काम बंद करण्यास भाग पाडले . कारण सदर ठेकेदार अनेक वर्षां पासून केवळ मुदतवाढीवर असल्याने तसेच विविध कारणांनी कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा होती . 

पालिका सेवेत  मे. सैनिक इंटेलिजन्स अँड सेक्युरिटी प्रा.लि. मार्फत असलेल्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कंत्राट बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला . त्यात स्थानिक सुरक्षा रक्षक सुद्धा संख्येने नाईक होते . दरम्यान सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासह पुढील कार्यवाही बारगळली . 

दुसरीकडे सुरक्षा रक्षकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता ठेकेदार व प्रशासनाने परस्पर सुरक्षा रक्षक कमी केल्याने अनेक स्थानिकांवर बेरोजगारीची पाळी आली . त्यांनी आमदार गीता भरत जैन यांच्याकडे नोकरी मिळावी म्हणून अर्ज केले . आ . जैन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा चालवला होता . पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेण्याची तयारी केल्याने स्थानिकांना संधी मिळणार नाही म्हणून त्यास आ . जैन यांनी विरोध केला . 

अखेर स्थानिक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी करून लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेण्यात यावे ह्या मागणीवर उपमुख्यमंत्री व आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली . त्यामुळे आता स्थानिक बेरोजगार झालेल्या ५० सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळा तर्फे महापालिकेत पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे .

पुन्हा पालिका सेवेत रुजू झालेल्या सुरक्षा रक्षकांनी आ जैन यांची भेट घेऊन आभार मानले .  महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन चे संयुक्त सरचिटणीस ऍड . अजिंक्य भोसले आदी उपस्थित होते . पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळाला असून आणखी १५०  सुरक्षा रक्षकांना सुद्धा टप्या टप्याने पुन्हा सेवेत घेतले जाईल असे आ . जैन यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर