शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

१३ दिवसात १७५६ वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 16:04 IST

९२ जणांनी केले मनाई आदेशाचे उल्लंघन

-  अनिकेत घमंडी

डोंबिवली: २ ते १४ जुलै दरम्यान पुन्हा घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मनाई आदेश असतांनाही रस्त्यांवर फिरणा-या 1756 वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये १३७५ दुचाकी, १३९ चार चाकी, २४२ तीन चाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती विभागीय पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

कल्याण परिमंडळ पोलीस ठाण्यातील बाजारपेठ, महात्मा फुले, कोळसेवाडी, खडकडपाडा, मानपाडा, रामनगर, विष्णुनगर, टिळकनगर पोलीस ठाण्याचा त्यात समावेश असून सर्वाधिक केसेस या कोळसेवाडी आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सगळयात कमी केसेस टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत.

मास्क न लावणा-या ३७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ९२ जणांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.  या कालावधीत १० वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीसांवरील हल्लयाच्या घटना शून्य असल्याने त्याबद्दल पानसरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.  

आता पुन्हा 19 जुलै पर्यन्त लॉकडाऊन वाढवला असून कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी गांभीर्य बाळगावे असे आवाहन पानसरे यांनी केले आहे. दुचाकीवर तीन जण बसून जातात, रिक्षेत पाच जण बसतात हे योग्य नाही असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसthaneठाणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसkalyanकल्याण