शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत 47 टक्के मतदानाची झाली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 18:29 IST

राजू काळेभार्इंदर, दि. 20 - मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत मुसळधार पावसातही अंदाजे ४७ टक्के मतदान केले असले तरी पालिका प्रशासन व राजकाण्यांनी त्यावर असमाधान व्यक्त केले. एकूण ५०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले असले तरी दुस-या दिवशी पालिकेवर कोण कोण निवडून जाणार हे सकाळी १० वाजल्यापासून जाहीर होणार आहे.सकाळी ...

राजू काळेभार्इंदर, दि. 20 - मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत मुसळधार पावसातही अंदाजे ४७ टक्के मतदान केले असले तरी पालिका प्रशासन व राजकाण्यांनी त्यावर असमाधान व्यक्त केले. एकूण ५०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले असले तरी दुस-या दिवशी पालिकेवर कोण कोण निवडून जाणार हे सकाळी १० वाजल्यापासून जाहीर होणार आहे.सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्यावेळी मतदारांनी काही मतदान केंद्रांवर गर्दी करून चांगला प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील मतदानाचा आकडा ६ टक्क्यांवर स्थिरावला. यानंतर सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झाल्याचे जाहिर करण्यात आले. गतवेळच्या निवडणुकांत दुस-या टप्यातील मतदान २० ते २५ टक्यांवर गेले असताना ऐन मतदानाच्या दिवशी मुसळधार पावसाने कहर केल्याने यंदाच्या मतदानाचा टक्काही थंडावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचा आकडा २६ टक्यांवर गेल्यानंतर मतदारांनी भर पावसात मतदान केंद्रांकडे ख-या अर्थाने कूच करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी पावसामुळे मतदानाचा आकडा घसरण्याची धास्ती प्रशासन व राजकारण्यांना लागुन राहिली होती. परंतु, दुपारी ३.३० वाजल्यानंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढू लागला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. यानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा टक्का ४७ पर्यंत स्थिरावला. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला, वेधशाळेकडून शनिवार व रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने चिंता लागली होती. पावसाचा अंदाज हेरुन प्रशासनाने प्रत्येक मतदार केंद्रात मंडप घातले. यामुळे मतदारांना दिलासा मिळाला. मतदान करण्यासाठी येणाय््राा वृद्ध व अपंगांसाठी प्रशासनाने प्रथमच डोली (पालखीची) सोय उपलब्ध करुन दिल्याने त्या मतदारांची चांगली सोय झाली. परंतु, यंदाच्या निवडणुकीत चार जणांच्या पॅनलनुसार केलेल्या प्रभाग रचनांमुळे नेमके मतदान केंद्र शोधताना अडचण निर्माण होत होती. दरम्यान मीरारोड येथील आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन शाळेतील मतदान केंद्रात एका अधिकृत मतदाराच्या नावावर तोतया मतदाराने मतदान केले. यामुळे या केंद्रावर बोगस मतदान झाल्याची चर्चा सुरु झाली होती. तत्पुर्वी काँग्रेसचे प्रभारी राजेश शर्मा यांनी याच केंद्रावर बोगस मतदान होणार असल्याची शक्यता वर्तविली होती. ती खरी ठरल्याचा दावा काँग्रेसच्या पदाधिकाय््राांकडुन करण्यात आला. तसेच भार्इंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेतील मतदान केंद्रात आ. नरेंद्र मेहता यांनी आगमन करताच तेथे उपस्थित असलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे सेना-भाजपा कार्यकर्त्यांत बाचाबाची झाल्याने पोलिसांना त्यांना पांगविण्यासाठी लाठ्या उगाराव्या लागल्या. यंदाची निवडणुक थेट सेना-भाजपात होत असल्याने सेनेचे आ. प्रताप सरनाईक व आ. मेहता मतदानाचा आढावा घेण्यासाठी शहरभर फिरताना दिसत होते. मतदानाला सुरुवात होताच शहरातील नेत्यांनी आपापल्या मतदान केंद्रांत मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाच्या पुर्व संध्येला एका महिलेकडे ४० लाखांची रोकड सापडल्यासह प्रभाग २ मधील भाजपाच्या उमेदवार शानू गोहिल यांनी प्रभागात पैसे वाटल्याच्या तसेच भार्इंदर पश्चिमेकडील बालाजीनगरमध्ये कल्याणचे भाजपा आ. नरेंद्र पवार फिरत असल्याच्या अफवेचे शहरात पीक आले होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे निवडणुक व पोलिस प्रशासनाकडुन सांगण्यात आले.माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित : मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने वेधशाळेची संवाद साधणे आवश्यक होते. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊनच आयोगाने मतदानावर विपरीत परिणाम होण्याच्या शक्यतेनुसार निवडणुकीची तारीख निश्चित करणे आवश्यक होते. यंदाच्या निवडणुकीत एकुण १७ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्यांपैकी केवळ प्रभाग १७ मधील एकाच तृतीपयंथी मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान थेट केंद्रात तसेच १०० मीटर प्रतिबंधित परिघात उमेदवारांचा सर्रास वावर होता. त्यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काढण्यासाठी निवडणुक व पोलिस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. प्रत्येक केंद्रात मतदारांना उमेदवारांची माहिती मिळावी, यासाठी प्रशासनाने उमेदवारांच्या तपशीललांचे फलक दर्शनी भागात लावले होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक