शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीसाठी ४० कोटी; पथदिव्यांची व्यवस्था, गटारेही बांधणार, रस्त्यांचा प्रश्न कायमच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:37 IST

औद्योगिक परिसरातील कारखान्यांची वार्षिक उलाढाल एक हजार ५०० कोटी रुपये आहे.

कल्याण : डोंबिवली औद्योगिक परिसरात पथदिवे लावण्याकरिता आणि गटार बांधण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्ते विकासासाठीही निधी हवा होता; मात्र तो मिळाला नाही. औद्योगिक परिसरातील कारखान्यांची वार्षिक उलाढाल एक हजार ५०० कोटी रुपये आहे. चांगल्या सोयीसुविधा दिल्यास व्यावसायिक उलाढाल ५० टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे आणखी रोजगारनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास कामा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.डोंबिवली औद्योगिक वसाहत २४५ हेक्टर जागेवर वसली आहे. औद्योगिक वसाहतीचे दोन टप्पे आहेत. या दोन टप्प्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त कारखाने आहेत. रासायनिक, कापडप्रक्रिया आणि इंजिनीअरिंगचे कारखाने असून त्यांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचे उत्पादन निर्यात केले जाऊ शकते. उत्पादनात वाढही होऊ शकते. डोंबिवली औद्योगिक कारखान्यातून वर्षाला दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याने उत्पादन क्षमता वाढत नाही. त्याचा फटका व्यवसायाला बसत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू आणि कामाचे अध्यक्ष मुरली अय्यर तथा पदाधिकारी देवेन सोनी यांनी ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. कामा संघटनेची मागणी विचारात घेता सरकारने ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार, निविदाही काढली आहे. ४० कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांवरील पथदिवे आणि रस्त्याच्या कडेला असलेली गटारे बांधली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीत पथदिवे नसल्याने रात्री परतणाऱ्या कामगारांचा पगार लुटण्याच्या घटना घडल्या आहे. येथील पायाभूत सोयीसुविधांच्या अभावावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता.कारखानदारांकडे एलबीटीपोटी ८३ कोटींची वसुली थकीत असल्याचे केडीएमसीने म्हटले आहे. आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत मागच्या महिन्यात कामाच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. त्यावेळी ही थकबाकी माफ करा, अशी मागणी कारखानदारांनी केली. एलबीटी वसूल केली जाते. मात्र, कारखानदारांना सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला. २७ गावांसह एमआयडीसीचा भाग महापालिकेत जून २०१५ मध्ये समाविष्ट केला असला, तरी प्रशासकीयदृष्ट्या हा भाग महापालिकेस हस्तांतरित झालेला नाही. त्याठिकाणचे रस्ते महापालिकेस वर्ग केलेले नाहीत. त्यामुळे रस्तेदुरुस्ती करणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे हा विषय शासनदरबारी कामाच्या वतीने पुन्हा मांडण्यात आला. त्यावेळी पथदिवे आणि गटारांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी आल्याने ही कामे मार्गी लागणार आहेत. औद्योगिक वसाहतीत रस्त्यांचा विषय प्रलंबित राहिला आहे. पायाभूत सोयीसुविधा पुरवल्यास डोंबिवली औद्योगिक वसाहतीची व्यावसायिक उलाढाल ५० टक्क्यांनी वाढू शकते. आता वार्षिक उलाढाल दीड हजार कोटीची असून ती अडीच हजार कोटी रुपयांच्या घरात जाईल. त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतील. याचा विचार राज्य सरकारसह महापालिकेनेही केला पाहिजे, असे मत कामाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.गलथान कारभाराचा फटकासरकारने २७ गावे आणि एमआयडीसीचा भाग महापालिकेत जून २०१५ मध्ये समाविष्ट केला. त्या भागातील रस्ते महापालिकेकडे अद्याप वर्ग केलेले नाहीत. शाळा तसेच आरोग्यव्यवस्थाही महापालिकेकडे वर्ग केलेली नाही.सरकारच्या या गलथान कारभाराचा फटका आरोग्य व शिक्षणासह औद्योगिक प्रगतीलाही बसत आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारला याविषयीचा निर्णय घ्यावासा वाटला नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवली