शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कल्याण तालुक्यातील ३५ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:29 IST

उल्हास नदीवरील रायते पुलावरून शुक्र वारी रात्री पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग बंद केला.

म्हारळ : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने शुक्रवार रात्रीपासून झोडपून काढले. तालुक्यातील ३५ गावांचा संपर्क तुटला. सखल भाग असलेल्या म्हारळ परिसरात पाणी साचल्याने तेथील नागरिकांची शनिवारी दुपारनंतर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे (एनडीआरएफ) एक पथक आणि लष्कराच्या दोन पथकांनी बोटींद्वारे सुटका करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. तर, रायता येथील उल्हास नदीजवळील केडिया फार्ममधील जवळपास २१ गायी-वासरे पुरात वाहून गेल्याचे समजते.म्हारळ येथील बोडके चाळ, राधाकृष्ण नगरी, अनसूयानगर, गणेशनगर आणि रिजन्सी संकुल परिसर पाण्यात बुडाला. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महामार्गावरही पाच ते दहा फूट पाणी साचले. त्यामुळे कल्याण-मुरबाड-नगरदरम्यानची वाहतूक ठप्प झाली.उल्हास नदीवरील रायते पुलावरून शुक्र वारी रात्री पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग बंद केला. कल्याणला येणारे सर्वच मार्ग बंद झाल्याने शेकडो वाहने महामार्गावर अडकून पडली. कांबा परिसरात महापालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दल आणि बोटींद्वारे मोर्यानगरातील बुडालेल्या चाळीतील ४५ रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.आणे गाव उल्हास नदीकाठी असल्याने ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. तेथील ५५० ग्रामस्थांनी १५० जनावरांसह लगतच्या टेकडीवर आश्रय घेतला. मात्र, प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रायते गावातही नदीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले. तेथे घराघरांमध्ये पाणी शिरल्याने सामानाचे प्रचंड नुकसान झाले.शहाड परिसरात मोहना रोड पाण्याखाली गेल्याने शहाड पुलावर वाहने अडकून पडली. बंदरपाडा परिसर जलमय झाल्याने तेथील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मोहना रोड येथील मुथा संकुलाच्या मागील बाजूस नाल्याशेजारी असलेल्या सद्गुरूनगर चाळीतील सर्व रहिवाशांना पाटीदार भवन येथे स्थलांतरित करण्यात आले. आ. नरेंद्र पवार यांनी बोटीने पुराची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.नागरिकांनी व्यक्त केला रोषकल्याण ग्रामीण भागातील वरप, कांबा आणि म्हारळ येथे नेते मंडळींनी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी नेत्यांना आता उशिरा जाग आली का, असा सवाल करत रोष व्यक्त केला. सगळे झाल्यावर नेते येतात. ही काय येण्याची वेळ आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याच्या प्रवाहातून बोटीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने अधिक मेहनत घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, रायते, वाहोली, मांजर्ली, आपटी, रोहन, चौरे, पोई, दहागाव, बापसाई, मामनोली केळणी, अनखरपाडा, अनखर, कुंदे आदी ३५ गावांचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊस