शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यात ३२७ एकर जमिनीचा घोटाळा, सीबीआयच्या अहवालातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 03:25 IST

सीबीआयच्या अहवालातील धक्कादायक वास्तव : केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या दुर्लक्षाने जमीन गिळंकृत

संदीप शिंदे 

मुंबई : स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाली आणि त्यांच्या ताब्यातली जमीन सरकारजमा झाली. त्या काळी ग्वाल्हेर संस्थानाकडे ठाण्याच्या माजिवडा आणि येऊर परिसरातील तब्बल ३२७ एकर जमीन होती. मात्र, सरकारी अनास्थेचा गैरफायदा घेत ही जमीन ठाण्यातील विकासक आणि भूखंड माफियांनी लाटली आहे. आजच्या घडीला किमान आठ हजार कोटी रुपये किमतीच्या या जमीन गैरव्यवहारातील दोषी हुडकून काढण्यासाठी सीबीआयने सुरू केलेल्या तपासात ही माहिती पुढे आली आहे. मात्र, आता या जमिनीशी केंद्र सरकारचा संबंध नसल्याचा निष्कर्ष काढून सीबीआयने तपासाची फाइलच बंद केली आहे.

१९२५ साली या जमिनीचे मालक मथुरादास गोकुळदास यांनी ग्वाल्हेर संस्थानाकडून घेतलेल्या कर्जापोटी ही जमीन गहाण ठेवली होती. १९३८ पासून या घराण्याचे अर्थमंत्री आणि त्यांच्या अखत्यारीतल्या प्राव्हिडंट इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकडे (पीआयसीएल) जमिनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. मथुरादास यांना ग्वाल्हेर स्टेट रेल्वेच्या तिजोरीतून कर्ज देण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर ही रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन झाली. त्यामुळे गहाण ठेवलेली जमीनही केंद्र सरकारच्या ताब्यात गेली. त्यानंतरही मध्य प्रदेश सरकारची पब्लिक अंडरटेकिंग कंपनी असलेल्या पीआयसीएलकडेच जमीन देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून पद्धतशीरपणे जमिनीचा गैरव्यवहार सुरू केला.

ही जमीन बांधकाम व्यावसायिक आणि प्रवर्तकांना बेकायदा पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली. काही ठिकाणी थेट विक्रीसुद्धा झाली. त्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. पीआयसीएल आणि मध्य प्रदेश सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी त्यासाठी वादग्रस्त पद्धतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्या परवानग्यांच्या जोरावर बांधकाम व्यावसायिकांनी ठाणे पालिकेकडून विकास प्रस्ताव मंजूर करून घेतले आणि इमारतीसुद्धा थाटल्या. तर बहुसंख्य जागेवर बेकायदा इमारती आणि चाळी थाटण्यात आल्या आहेत. पीआयसीएल, मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने कोणत्याही हालचाली न केल्याने ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही जमीन सरकारला जवळपास गमवावी लागली आहे.वादग्रस्त जमीनच्गहाण ठेवलेल्या जमिनीपैकी माजिवडा क्षेत्रातील ८० एकर आणि येऊरची ९५ एकर जमीन बेकायदा पद्धतीने भाडेतत्त्वावर बहाल केलेली आहे. याच पद्धतीने भारत स्मॉल क्राफ्टला पूर्वी भाड्याने दिलेल्या २२ एकर जागेवर आता अतिक्रमण झाले आहे. ग्लॅक्सो कंपनीने २७, म्हाडाने १३ तर एअरफोर्सनेही फायरिंग रेंजसाठी २९ एकर जागा ताब्यात घेतली आहे.च्येऊरची ५० एकर जागा शहरीकरण झालेल्या गावांतल्या आदिवासींनी बळकावलेली आहे. एअरफोर्स आणि म्हाडाने ताब्यात घेतलेल्या जमिनीवरही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रण केले आहे. या जमिनीचा कोणताही मोबदला सरकारला मिळालेला नाही.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग