शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:11 IST

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन ठाण्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट न करता ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

ठळक मुद्देन्यायालयाचा मान राखत डीजेला निरोपढोलताशांचा गजरसोमवारी पहाटेपर्यंत झाले विसर्जन

ठाणे : डॉल्बी अर्थात डीजेचा दणदणाट न करता ढोलताशांच्या गजरात ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला भावपूर्ण विसर्जन केले. यंदाही घरगुती श्रींच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सोमवारी पहाटेपर्यंत ७५० सार्वजनिक, तर ३१ हजार ७१६ घरगुती गणरायांचे शांततेत विसर्जन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दहा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होण्यापूर्वीच न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे काही मंडळांनी नाराजी, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुका कशा काढतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाण्यात विसर्जन मिरवणुका निघण्यापूर्वी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सार्वजनिक गणेश मंडळांची एक बैठक घेतली होती. याच बैठकीमध्ये डीजेला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सहआयुक्त मधुकर पांडेय यांनीही तसे आदेश काढले होते. तर, पोलीस ठाण्यांच्या पातळीवर झालेल्या बैठकीत डीजेचालकांनाही डीजेवरील बंदीचे आदेश दिले होते. डीजेबंदीचे ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशी कुठेही डीजेच्या दणदणाटात विसर्जन मिरवणूक निघाली नाही. केवळ कल्याणमधील एका मंडळाने डीजे नसेल, तर विसर्जन करणार नाही, असा पवित्रा घेतला होता, पण हा वादही नंतर निवळल्याचे पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे शहर परिमंडळ-१ मध्ये खारेगाव पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट, मासुंदा तलाव आदी कृत्रिम तलावांमध्येही पाच हजार ३०८ गणरायांचे विसर्जन झाले. शहरात १०१ सार्वजनिक गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर, वागळे इस्टेट या परिमंडळ-५ मध्ये उपवन तलाव, कोलशेत खाडी तसेच रायलादेवी आणि उपवन येथील कृत्रिम तलावांमध्ये चार हजार १६१ खासगी, तर १५२ मूर्तींचे विसर्जन झाले. कल्याणमध्ये १६९ सार्वजनिक, तर नऊ हजार ६११ खासगी गणरायांचे विसर्जन झाले. याशिवाय, भिवंडीतील नदीनाका, वºहाळादेवी घाट, काल्हेर खाडी आदी ठिकाणी १२९ सार्वजनिक आणि २५३० खासगी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच उल्हास नदी आणि मोहना घाट याठिकाणी परिमंडळ-४, उल्हासनगरातील १८८ सार्वजनिक, तर १० हजार १०६ श्रींच्या मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले. ठाण्यात रेतीबंदर खाडी येथे अखेरच्या सार्वजनिक गणरायाच्या मूर्तीचे सोमवारी पहाटे ५ वाजता, तर कल्याणमध्ये सोमवारी ६ वाजेपर्यंत विसर्जन सुरूहोते.ठाण्यासह संपूर्ण पोलीस आयुक्तालय परिसरात सात ते आठ हजार पोलीस गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात होते. किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली...............................

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकGanesh Visarjanगणेश विसर्जन