शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:11 IST

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन ठाण्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट न करता ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

ठळक मुद्देन्यायालयाचा मान राखत डीजेला निरोपढोलताशांचा गजरसोमवारी पहाटेपर्यंत झाले विसर्जन

ठाणे : डॉल्बी अर्थात डीजेचा दणदणाट न करता ढोलताशांच्या गजरात ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला भावपूर्ण विसर्जन केले. यंदाही घरगुती श्रींच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सोमवारी पहाटेपर्यंत ७५० सार्वजनिक, तर ३१ हजार ७१६ घरगुती गणरायांचे शांततेत विसर्जन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दहा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होण्यापूर्वीच न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे काही मंडळांनी नाराजी, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुका कशा काढतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाण्यात विसर्जन मिरवणुका निघण्यापूर्वी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सार्वजनिक गणेश मंडळांची एक बैठक घेतली होती. याच बैठकीमध्ये डीजेला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सहआयुक्त मधुकर पांडेय यांनीही तसे आदेश काढले होते. तर, पोलीस ठाण्यांच्या पातळीवर झालेल्या बैठकीत डीजेचालकांनाही डीजेवरील बंदीचे आदेश दिले होते. डीजेबंदीचे ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशी कुठेही डीजेच्या दणदणाटात विसर्जन मिरवणूक निघाली नाही. केवळ कल्याणमधील एका मंडळाने डीजे नसेल, तर विसर्जन करणार नाही, असा पवित्रा घेतला होता, पण हा वादही नंतर निवळल्याचे पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे शहर परिमंडळ-१ मध्ये खारेगाव पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट, मासुंदा तलाव आदी कृत्रिम तलावांमध्येही पाच हजार ३०८ गणरायांचे विसर्जन झाले. शहरात १०१ सार्वजनिक गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर, वागळे इस्टेट या परिमंडळ-५ मध्ये उपवन तलाव, कोलशेत खाडी तसेच रायलादेवी आणि उपवन येथील कृत्रिम तलावांमध्ये चार हजार १६१ खासगी, तर १५२ मूर्तींचे विसर्जन झाले. कल्याणमध्ये १६९ सार्वजनिक, तर नऊ हजार ६११ खासगी गणरायांचे विसर्जन झाले. याशिवाय, भिवंडीतील नदीनाका, वºहाळादेवी घाट, काल्हेर खाडी आदी ठिकाणी १२९ सार्वजनिक आणि २५३० खासगी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच उल्हास नदी आणि मोहना घाट याठिकाणी परिमंडळ-४, उल्हासनगरातील १८८ सार्वजनिक, तर १० हजार १०६ श्रींच्या मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले. ठाण्यात रेतीबंदर खाडी येथे अखेरच्या सार्वजनिक गणरायाच्या मूर्तीचे सोमवारी पहाटे ५ वाजता, तर कल्याणमध्ये सोमवारी ६ वाजेपर्यंत विसर्जन सुरूहोते.ठाण्यासह संपूर्ण पोलीस आयुक्तालय परिसरात सात ते आठ हजार पोलीस गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात होते. किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली...............................

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकGanesh Visarjanगणेश विसर्जन