शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:11 IST

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन ठाण्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट न करता ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

ठळक मुद्देन्यायालयाचा मान राखत डीजेला निरोपढोलताशांचा गजरसोमवारी पहाटेपर्यंत झाले विसर्जन

ठाणे : डॉल्बी अर्थात डीजेचा दणदणाट न करता ढोलताशांच्या गजरात ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला भावपूर्ण विसर्जन केले. यंदाही घरगुती श्रींच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सोमवारी पहाटेपर्यंत ७५० सार्वजनिक, तर ३१ हजार ७१६ घरगुती गणरायांचे शांततेत विसर्जन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दहा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होण्यापूर्वीच न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे काही मंडळांनी नाराजी, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुका कशा काढतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाण्यात विसर्जन मिरवणुका निघण्यापूर्वी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सार्वजनिक गणेश मंडळांची एक बैठक घेतली होती. याच बैठकीमध्ये डीजेला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सहआयुक्त मधुकर पांडेय यांनीही तसे आदेश काढले होते. तर, पोलीस ठाण्यांच्या पातळीवर झालेल्या बैठकीत डीजेचालकांनाही डीजेवरील बंदीचे आदेश दिले होते. डीजेबंदीचे ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशी कुठेही डीजेच्या दणदणाटात विसर्जन मिरवणूक निघाली नाही. केवळ कल्याणमधील एका मंडळाने डीजे नसेल, तर विसर्जन करणार नाही, असा पवित्रा घेतला होता, पण हा वादही नंतर निवळल्याचे पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे शहर परिमंडळ-१ मध्ये खारेगाव पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट, मासुंदा तलाव आदी कृत्रिम तलावांमध्येही पाच हजार ३०८ गणरायांचे विसर्जन झाले. शहरात १०१ सार्वजनिक गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर, वागळे इस्टेट या परिमंडळ-५ मध्ये उपवन तलाव, कोलशेत खाडी तसेच रायलादेवी आणि उपवन येथील कृत्रिम तलावांमध्ये चार हजार १६१ खासगी, तर १५२ मूर्तींचे विसर्जन झाले. कल्याणमध्ये १६९ सार्वजनिक, तर नऊ हजार ६११ खासगी गणरायांचे विसर्जन झाले. याशिवाय, भिवंडीतील नदीनाका, वºहाळादेवी घाट, काल्हेर खाडी आदी ठिकाणी १२९ सार्वजनिक आणि २५३० खासगी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच उल्हास नदी आणि मोहना घाट याठिकाणी परिमंडळ-४, उल्हासनगरातील १८८ सार्वजनिक, तर १० हजार १०६ श्रींच्या मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले. ठाण्यात रेतीबंदर खाडी येथे अखेरच्या सार्वजनिक गणरायाच्या मूर्तीचे सोमवारी पहाटे ५ वाजता, तर कल्याणमध्ये सोमवारी ६ वाजेपर्यंत विसर्जन सुरूहोते.ठाण्यासह संपूर्ण पोलीस आयुक्तालय परिसरात सात ते आठ हजार पोलीस गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात होते. किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली...............................

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकGanesh Visarjanगणेश विसर्जन