शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

३१ दिवसांत रुग्णसंख्या ६0४!, रुग्णसंख्या ६१५, आतापर्यंत १९ रुग्ण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:06 IST

२४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पंकज रोडेकर ठाणे : जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात आढळल्यानंतर शनिवार, २५ एप्रिलपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६१५ झाली आहे. २४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.२ एप्रिल रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात २४ रुग्ण सापडले होते. या कालावधीत सहा दिवस असे आहेत, की त्यादिवशी तब्बल ४0 ते ४६ रुग्ण सापडले आहेत. उल्हासनगर येथे सापडलेल्या पहिल्या रुग्णानंतर दुसरा रुग्ण आढळून येण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पहिला रुग्ण सापडल्यावर एक महिन्यानंतर भिवंडीत पहिला रुग्ण मिळाला.ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांसह दोन नगरपालिका व ग्रामीण भागात आतापर्यंत १२ हजार १६६ संशयित रुग्ण मिळाले. त्यापैकी सात हजार ९९४ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांमध्ये एक हजार २१0 संशयितांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा आणि जे.जे. रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतही पाठवण्यात आले होते. त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यापैकी आतापर्यंत १९ रुग्ण दगावले असले तरी, १२८ जणांनी या कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत.जिल्ह्यात पहिला रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. त्यानंतर १२ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण ठामपामध्ये सापडला नव्हता. तेराव्या दिवसांपासून दहापेक्षा कमी रुग्ण दररोज सापडायला सुरुवात झाली. मात्र १३ एप्रिलला एकाच दिवशी २३ रुग्ण वाढले. तेव्हापासून रुग्णांची संख्या शून्यावर येऊ शकली नाही. रुग्णांचा आलेख वाढत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत २५ एप्रिलपर्यंत २0९ रुग्ण मिळाले.कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्च रोजी मिळाला. केडीएमसीने १८ एप्रिल रोजी, तर नवी मुंबईने २ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. या दोन्ही महापालिकांनी रुग्णांचे शतक एकापाठोपाठ पूर्ण केले आहे. मीरा-भार्इंदर येथे पहिला रुग्ण २९ मार्च रोजी मिळाला. या महानगरपालिकेने १३ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. अल्प कालावधीत या पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक गाठले. अंबरनाथ आणि बदलापूर येथे ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी प्रत्येकी एकेक रुग्ण आढळला होता. सद्य:स्थितीत अंबरनाथ येथे एकूण चार तर बदलापूरमध्ये रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे.ठाणे ग्रामीणमध्ये २५ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत १७ रुग्ण सापडले आहे. उल्हासनगर येथे पहिला रुग्ण १९ मार्च रोजी सापडला असला तरी, दुसरा रुग्ण तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे २३ एप्रिल रोजी आढळून आला. सुरुवातीच्या महिनाभरात एकही रुग्ण न सापडणाऱ्या भिवंडीत १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत येथील एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.>जिल्ह्यात १३ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून २५ एप्रिलपर्यंत सहा दिवस असे आहेत की, त्यादिवशी जिल्ह्यातएकही रुग्ण सापडलेला नाही.उर्वरित दिवसांमध्ये एक किंवा दोन रुग्ण मिळालेले पाचदिवस आहेत. एका दिवशी तीन, तर दोन दिवशी चार आणिपाच रुग्ण मिळाले.६, ७,८ आणि ९ रुग्ण मिळालेले प्रत्येकी एकेक दिवस आहेत. दोन दिवस आहेत, ज्यावेळी प्रत्येकी १२ आणि १३ रुग्णमिळाले होते.एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण मिळण्याचे प्रमाण ४0 ते ४६ आहे. एवढे रुग्ण मिळणारे गेल्या ३१ दिवसांत असे सहा दिवस असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या