शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

३१ दिवसांत रुग्णसंख्या ६0४!, रुग्णसंख्या ६१५, आतापर्यंत १९ रुग्ण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:06 IST

२४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पंकज रोडेकर ठाणे : जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात आढळल्यानंतर शनिवार, २५ एप्रिलपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६१५ झाली आहे. २४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.२ एप्रिल रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात २४ रुग्ण सापडले होते. या कालावधीत सहा दिवस असे आहेत, की त्यादिवशी तब्बल ४0 ते ४६ रुग्ण सापडले आहेत. उल्हासनगर येथे सापडलेल्या पहिल्या रुग्णानंतर दुसरा रुग्ण आढळून येण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पहिला रुग्ण सापडल्यावर एक महिन्यानंतर भिवंडीत पहिला रुग्ण मिळाला.ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांसह दोन नगरपालिका व ग्रामीण भागात आतापर्यंत १२ हजार १६६ संशयित रुग्ण मिळाले. त्यापैकी सात हजार ९९४ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांमध्ये एक हजार २१0 संशयितांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा आणि जे.जे. रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतही पाठवण्यात आले होते. त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यापैकी आतापर्यंत १९ रुग्ण दगावले असले तरी, १२८ जणांनी या कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत.जिल्ह्यात पहिला रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. त्यानंतर १२ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण ठामपामध्ये सापडला नव्हता. तेराव्या दिवसांपासून दहापेक्षा कमी रुग्ण दररोज सापडायला सुरुवात झाली. मात्र १३ एप्रिलला एकाच दिवशी २३ रुग्ण वाढले. तेव्हापासून रुग्णांची संख्या शून्यावर येऊ शकली नाही. रुग्णांचा आलेख वाढत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत २५ एप्रिलपर्यंत २0९ रुग्ण मिळाले.कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्च रोजी मिळाला. केडीएमसीने १८ एप्रिल रोजी, तर नवी मुंबईने २ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. या दोन्ही महापालिकांनी रुग्णांचे शतक एकापाठोपाठ पूर्ण केले आहे. मीरा-भार्इंदर येथे पहिला रुग्ण २९ मार्च रोजी मिळाला. या महानगरपालिकेने १३ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. अल्प कालावधीत या पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक गाठले. अंबरनाथ आणि बदलापूर येथे ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी प्रत्येकी एकेक रुग्ण आढळला होता. सद्य:स्थितीत अंबरनाथ येथे एकूण चार तर बदलापूरमध्ये रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे.ठाणे ग्रामीणमध्ये २५ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत १७ रुग्ण सापडले आहे. उल्हासनगर येथे पहिला रुग्ण १९ मार्च रोजी सापडला असला तरी, दुसरा रुग्ण तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे २३ एप्रिल रोजी आढळून आला. सुरुवातीच्या महिनाभरात एकही रुग्ण न सापडणाऱ्या भिवंडीत १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत येथील एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.>जिल्ह्यात १३ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून २५ एप्रिलपर्यंत सहा दिवस असे आहेत की, त्यादिवशी जिल्ह्यातएकही रुग्ण सापडलेला नाही.उर्वरित दिवसांमध्ये एक किंवा दोन रुग्ण मिळालेले पाचदिवस आहेत. एका दिवशी तीन, तर दोन दिवशी चार आणिपाच रुग्ण मिळाले.६, ७,८ आणि ९ रुग्ण मिळालेले प्रत्येकी एकेक दिवस आहेत. दोन दिवस आहेत, ज्यावेळी प्रत्येकी १२ आणि १३ रुग्णमिळाले होते.एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण मिळण्याचे प्रमाण ४0 ते ४६ आहे. एवढे रुग्ण मिळणारे गेल्या ३१ दिवसांत असे सहा दिवस असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या