शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

तांत्रिक चुकीमुळे शून्य गुण मिळालेल्या आयटीआयचे ३० विद्यार्थी झाले उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:10 IST

मनविसेमुळे हक्काचे गुण मिळाल्याची विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली .

ठळक मुद्देमनविसेमुळे मिळाले हक्काचे गुण* : विद्यार्थ्यांची प्रतिक्रियामनविसेमुळे मिळाले हक्काचे गुण : विद्यार्थ्यांची प्रतिक्रियामनसेच्या प्रयत्नाला यश

ठाणे : वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने आणि तांत्रिक चुकीमुळे शून्य गुण देण्यात आलेले ते ३० विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले असल्याने त्यांनी एकच जल्लोष केला. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तात्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. मनविसेमुळे आम्हाला हक्काचे गुण मिळाल्याची प्रतिक्रिया या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी ऑनलाईन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गातील तब्बल ३० जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावेळी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दाद दिली नाही. वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने या विद्यार्थ्यांनी मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या आलेल्या तक्रारी लक्षात घेता विद्यार्थी सेनेने महाविद्यालयात धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. पर्यवेक्षक आणि तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला होता असे विद्यार्थ्यांनी सांगितले. आम्ही पुन्हा परीक्षेला बसण्याची तयारी केली होती. पण आमची चूक नसताना आम्हाला मनस्ताप भोगावा लागला होता. दिल्लीहून आलेल्या आयटीआयचे संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास करू असे सांगितले. नुकताच ऑनलाइन निकाल तपासला तेव्हा आम्ही पास झाल्याची आनंदाची बातमी मिळाली. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी महाविद्यालय प्रशासनाने ही चूक पर्यवेक्षकांबरोबर तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत ही चूक विद्यार्थ्यांच्या माथ्यावरही त्यांनी मारली.---------------------------------------------पर्यवेक्षकाच्या चुकी मुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते परंतु विद्यार्थ्यांनी मनविसेकडे समस्या मांडली त्यांनंतर आम्ही श्री. शाम अंबाळकर यांच्या मार्फत दिल्ली येथील आयटीआय मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा करून मुलांची तक्रार दूर केली. मुलाचे एक वर्ष वाचवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे - संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे --------------------------------------------हॉल तिकिटावर पेपरचा क्रमांक नसल्याने पर्यवेक्षक आणि विद्यार्थी संभ्रमात पडले. परंतु तांत्रिक चूक आणि पर्यवेक्षकाच्या चुकीबरोबर विद्यार्थी पेपर लिहीत असल्याबे त्यांचीही चूक असल्याचे प्राचार्य शाम अंबाळकर यांनी सांगितले. संपूर्ण वर्ग नापास झाला म्हणून पेपरची तपासणी झाली, एखाद दुसरा विद्यार्थी असता तर पेपर पुन्हा तपासला ही नसता असे उत्तरही त्यांनी दिले. तसेच आयटीआय, दिल्लीच्या प्रशिक्षण महानिर्देशक यांची स्वतः भेट घेऊन तांत्रिक चूक पण झाल्याची खात्री पटवून दिली आणि भविष्यात अशी घटना घडू नये याची काळजी घेणारी असल्याचे अंबाळकर म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणMNSमनसे