शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

भटक्या विमुक्त-आदिवासींच्या ४८ संघटना एकवटल्या- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 00:33 IST

दोन कोटी लोकांना नागरिकत्व कायद्याचा फटका

ठाणे : नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसी या केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त व आदिवासींच्या ४८ संघटना लवकरच संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तब्बल दोन कोटी भटके विमुक्त आपले नागरिकत्व सिद्ध कसे करणार, असा सवाल करीत आव्हाड म्हणाले की, यामुळे येत्या काळात या कायद्याविरोधात रक्तरंजित संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.आव्हाड म्हणाले की, चातुर्वर्ण्य मानसिकतेमुळे इथली व्यवस्था भटक्या विमुक्त समाजाला अजूनही स्वीकारत नाही. ग्रामसभेत ठराव करूनही भटक्या विमुक्तांना तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गावात राहू दिले जात नाही. यामुळे भटके विमुक्त शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. मृत्यू झालेल्यांचा दफनविधी अथवा सरणविधी गुपचूप करावा लागतो. घर नाही, जमीन नाही, गाव नाही, या स्थितीमुळेच सरकारने नेमलेल्या आयोगांनी ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे जन्मदाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखे पुरावे नाहीत. या कागदपत्रांअभावी नागरिकत्व कायद्याखाली दोन कोटी भटक्या विमुक्तांना डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंबणार का? ही केवळ हिंदू-मुसलमान लढाई नाही, तर जातीव्यवस्थेविरोधातील लढाई आहे. विमुक्त हे उमाजी नाईकांचे वारसदार आहेत. यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात भटके विमुक्त वेळप्रसंगी रक्तरंजित संघर्षही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमानवी हक्क अभियानाचे प्रमुख व एकनाथ आव्हाड यांचे पुत्र मिलिंद आव्हाड ऊर्फ जनजागृती, आदिवासी पारधी समाज संघटनेचे राजेंद्र काळे, सुनीता भोसले, अजित भोसले, नितीन भोसले, माणिक वाघ, ज्ञानदेव वाघ आदिवासी पारधी विकास परिषदेचे नूरकास बिर्याणी भोसले, बंड्या चिंग्या भोसले, नेनी अभय काळे, भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, पुणे या संघटनेच्या वैशाली भांडवलावर, रामोशी समाजाचे संतोष जाधव, प्रवीण नाईक, डावरी गोसावी समाजाचे भालचंद्र सावंत, वडार समाजाचे भारत विटेवर, ललिता धनवटे, बंजारा समाजाचे अंबरसिंग चव्हाण, राधेश्याम अडे, उल्हास राठोड, पारधी समाजाचे ईश्वर काळे, वैदू समाजाचे मानवेंद्र वैदू, गोसावी समाजाचे बालाजी तांबे, जोशी समाजाचे दिलीप परदेशी, आदिवासी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या सिल्लोड येथील मराठवाडा विभागाध्यक्ष शिवाजी कडुबा शेळके तसेच विजय रामलाल सुरवसे, फुलंब्री, संतोष दळे, औरंगाबाद तेजराव शेळके, सिल्लोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाड