शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

भटक्या विमुक्त-आदिवासींच्या ४८ संघटना एकवटल्या- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 00:33 IST

दोन कोटी लोकांना नागरिकत्व कायद्याचा फटका

ठाणे : नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसी या केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त व आदिवासींच्या ४८ संघटना लवकरच संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तब्बल दोन कोटी भटके विमुक्त आपले नागरिकत्व सिद्ध कसे करणार, असा सवाल करीत आव्हाड म्हणाले की, यामुळे येत्या काळात या कायद्याविरोधात रक्तरंजित संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.आव्हाड म्हणाले की, चातुर्वर्ण्य मानसिकतेमुळे इथली व्यवस्था भटक्या विमुक्त समाजाला अजूनही स्वीकारत नाही. ग्रामसभेत ठराव करूनही भटक्या विमुक्तांना तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गावात राहू दिले जात नाही. यामुळे भटके विमुक्त शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. मृत्यू झालेल्यांचा दफनविधी अथवा सरणविधी गुपचूप करावा लागतो. घर नाही, जमीन नाही, गाव नाही, या स्थितीमुळेच सरकारने नेमलेल्या आयोगांनी ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे जन्मदाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखे पुरावे नाहीत. या कागदपत्रांअभावी नागरिकत्व कायद्याखाली दोन कोटी भटक्या विमुक्तांना डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंबणार का? ही केवळ हिंदू-मुसलमान लढाई नाही, तर जातीव्यवस्थेविरोधातील लढाई आहे. विमुक्त हे उमाजी नाईकांचे वारसदार आहेत. यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात भटके विमुक्त वेळप्रसंगी रक्तरंजित संघर्षही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमानवी हक्क अभियानाचे प्रमुख व एकनाथ आव्हाड यांचे पुत्र मिलिंद आव्हाड ऊर्फ जनजागृती, आदिवासी पारधी समाज संघटनेचे राजेंद्र काळे, सुनीता भोसले, अजित भोसले, नितीन भोसले, माणिक वाघ, ज्ञानदेव वाघ आदिवासी पारधी विकास परिषदेचे नूरकास बिर्याणी भोसले, बंड्या चिंग्या भोसले, नेनी अभय काळे, भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, पुणे या संघटनेच्या वैशाली भांडवलावर, रामोशी समाजाचे संतोष जाधव, प्रवीण नाईक, डावरी गोसावी समाजाचे भालचंद्र सावंत, वडार समाजाचे भारत विटेवर, ललिता धनवटे, बंजारा समाजाचे अंबरसिंग चव्हाण, राधेश्याम अडे, उल्हास राठोड, पारधी समाजाचे ईश्वर काळे, वैदू समाजाचे मानवेंद्र वैदू, गोसावी समाजाचे बालाजी तांबे, जोशी समाजाचे दिलीप परदेशी, आदिवासी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या सिल्लोड येथील मराठवाडा विभागाध्यक्ष शिवाजी कडुबा शेळके तसेच विजय रामलाल सुरवसे, फुलंब्री, संतोष दळे, औरंगाबाद तेजराव शेळके, सिल्लोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाड