शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भटक्या विमुक्त-आदिवासींच्या ४८ संघटना एकवटल्या- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 00:33 IST

दोन कोटी लोकांना नागरिकत्व कायद्याचा फटका

ठाणे : नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसी या केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त व आदिवासींच्या ४८ संघटना लवकरच संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तब्बल दोन कोटी भटके विमुक्त आपले नागरिकत्व सिद्ध कसे करणार, असा सवाल करीत आव्हाड म्हणाले की, यामुळे येत्या काळात या कायद्याविरोधात रक्तरंजित संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.आव्हाड म्हणाले की, चातुर्वर्ण्य मानसिकतेमुळे इथली व्यवस्था भटक्या विमुक्त समाजाला अजूनही स्वीकारत नाही. ग्रामसभेत ठराव करूनही भटक्या विमुक्तांना तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गावात राहू दिले जात नाही. यामुळे भटके विमुक्त शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत. मृत्यू झालेल्यांचा दफनविधी अथवा सरणविधी गुपचूप करावा लागतो. घर नाही, जमीन नाही, गाव नाही, या स्थितीमुळेच सरकारने नेमलेल्या आयोगांनी ९८ टक्के भटक्या विमुक्तांकडे जन्मदाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखे पुरावे नाहीत. या कागदपत्रांअभावी नागरिकत्व कायद्याखाली दोन कोटी भटक्या विमुक्तांना डिटेन्शन कॅम्पमध्ये कोंबणार का? ही केवळ हिंदू-मुसलमान लढाई नाही, तर जातीव्यवस्थेविरोधातील लढाई आहे. विमुक्त हे उमाजी नाईकांचे वारसदार आहेत. यामुळेच नागरिकत्व कायद्याविरोधात भटके विमुक्त वेळप्रसंगी रक्तरंजित संघर्षही करतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीमानवी हक्क अभियानाचे प्रमुख व एकनाथ आव्हाड यांचे पुत्र मिलिंद आव्हाड ऊर्फ जनजागृती, आदिवासी पारधी समाज संघटनेचे राजेंद्र काळे, सुनीता भोसले, अजित भोसले, नितीन भोसले, माणिक वाघ, ज्ञानदेव वाघ आदिवासी पारधी विकास परिषदेचे नूरकास बिर्याणी भोसले, बंड्या चिंग्या भोसले, नेनी अभय काळे, भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, पुणे या संघटनेच्या वैशाली भांडवलावर, रामोशी समाजाचे संतोष जाधव, प्रवीण नाईक, डावरी गोसावी समाजाचे भालचंद्र सावंत, वडार समाजाचे भारत विटेवर, ललिता धनवटे, बंजारा समाजाचे अंबरसिंग चव्हाण, राधेश्याम अडे, उल्हास राठोड, पारधी समाजाचे ईश्वर काळे, वैदू समाजाचे मानवेंद्र वैदू, गोसावी समाजाचे बालाजी तांबे, जोशी समाजाचे दिलीप परदेशी, आदिवासी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या सिल्लोड येथील मराठवाडा विभागाध्यक्ष शिवाजी कडुबा शेळके तसेच विजय रामलाल सुरवसे, फुलंब्री, संतोष दळे, औरंगाबाद तेजराव शेळके, सिल्लोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाड