शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कल्याण- डोंबिवली महानगरपालिच्या २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 18:22 IST

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली

डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत त्याचप्रमाणे बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाक्षेत्रामध्ये शहरी भागात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरु असून केवळ २७ गावांना पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे २७ गावातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी आज अधिवेशनाच्या दिवशी औचित्याचा मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.सद्यस्थितीत नांदिवली, भोपर, सोनारपाडा, स्टार कॉलनी, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी गोळवली, पिसवली, आडीवली समर्थ नगर या गावांमध्ये आजदेखील टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत मा. जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्याच्या उपस्थितीत २ मे २०१७ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये २७ गावांना ५० एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे निर्देश दिले होते परंतु ४ ते ५ महिने होवूनही अद्यापही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच काटई नाका ते टाटा पावर पर्यंत पाण्याची जलवाहिनी कालबाह्य झालेली असून या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाची निविदा काढण्यात आलेली असून सदर कामाला देखील लवकरात लवकर सुरवात होणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.सध्या २७ गावांमध्ये ३० ते ३५ एमएलडी पाणीपुरवठा सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू २७ गावांना केवळ २० एमएलडी पाणी होतो. सदरचा पाणीपुरवठा हा अतिशय कमी असून २७ गावांना कमीत कामी ६० एमएलडी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र केवळ २० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्यामुळे २७ गावांची पाण्याची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. येथील नागरिकांनी वारंवार आंदोलने, हंडा मोर्चे काढूनही २७ गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. याकरिता आज विधानमंडळामध्ये औचित्याचा मुद्दा मांडण्यात आला तसेच जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी देखील करण्यात आली त्यावर मंत्रालयात तातडीने मिटिंग घेवून निर्णय घेण्यात येईल असे जलसंपदा मंत्री यांनी सांगितले आहे.तसेच २७ गावांमध्ये वाढीव पाणीपुरवठा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याकरिता सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून पाणीप्रश्न त्वरित सोडविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या मागणीला आमदार रुपेश म्हात्रे, आमदार भरत गोगावले, आमदार रमेश लटके यांनी पाठींबा दिला.

टॅग्स :Waterपाणी