शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण- डोंबिवली महानगरपालिच्या २७ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 18:22 IST

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली

डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाहद्दीमध्ये २७ गावांचा समावेश होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. २७ गावांमध्ये पाणी समस्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत त्याचप्रमाणे बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाक्षेत्रामध्ये शहरी भागात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरु असून केवळ २७ गावांना पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे २७ गावातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी आज अधिवेशनाच्या दिवशी औचित्याचा मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.सद्यस्थितीत नांदिवली, भोपर, सोनारपाडा, स्टार कॉलनी, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी गोळवली, पिसवली, आडीवली समर्थ नगर या गावांमध्ये आजदेखील टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत मा. जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्याच्या उपस्थितीत २ मे २०१७ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये २७ गावांना ५० एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे निर्देश दिले होते परंतु ४ ते ५ महिने होवूनही अद्यापही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच काटई नाका ते टाटा पावर पर्यंत पाण्याची जलवाहिनी कालबाह्य झालेली असून या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाची निविदा काढण्यात आलेली असून सदर कामाला देखील लवकरात लवकर सुरवात होणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.सध्या २७ गावांमध्ये ३० ते ३५ एमएलडी पाणीपुरवठा सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू २७ गावांना केवळ २० एमएलडी पाणी होतो. सदरचा पाणीपुरवठा हा अतिशय कमी असून २७ गावांना कमीत कामी ६० एमएलडी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र केवळ २० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्यामुळे २७ गावांची पाण्याची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. येथील नागरिकांनी वारंवार आंदोलने, हंडा मोर्चे काढूनही २७ गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. याकरिता आज विधानमंडळामध्ये औचित्याचा मुद्दा मांडण्यात आला तसेच जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी देखील करण्यात आली त्यावर मंत्रालयात तातडीने मिटिंग घेवून निर्णय घेण्यात येईल असे जलसंपदा मंत्री यांनी सांगितले आहे.तसेच २७ गावांमध्ये वाढीव पाणीपुरवठा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याकरिता सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून पाणीप्रश्न त्वरित सोडविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या मागणीला आमदार रुपेश म्हात्रे, आमदार भरत गोगावले, आमदार रमेश लटके यांनी पाठींबा दिला.

टॅग्स :Waterपाणी