शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

२७ गावांसाठी पाणी येणार कुठून? योजना मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:11 IST

केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, या गावांसाठी अद्याप पाण्याचा कोटाच आरक्षित नसल्याने ही योजना कार्यान्वित होऊ न बिनकामाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या एमआयडीसीकडून या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. कारण, योजनेसाठी आवश्यक पाणी येणार कुठून, हेच अद्याप गुलदस्त्यात असल्याने २७ गावांचा पाणीप्रश्न अधांतरीच राहण्याची शक्यता आहे.पालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी २७ गावांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे होती. या गावांना एमआयडीसीमार्फत दररोज ३० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. या ठिकाणी एकाच जलवाहिनीतून अनेक जोडण्या दिल्या गेल्यामुळे २७ गावांतील पाणीवितरण व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना पाणीटंचाईला तोंड जावे लागत आहे. या गावांची एमआयडीसीकडे थकबाकीही होती. ही गावे पालिकेत आल्यानंतर अमृत योजनेंतर्गत २७ गावांच्या पाणीवितरण व्यवस्थेसाठी १८० कोटींची योजना मंजूर झाली. वर्षभरात केवळ योजनेच्या निविदेवर काम अडून राहिले होते. आता पाचव्या वेळेस निविदा काढली जाणार असून सरकारने या योजनेसाठी १३ कोटींचा वाढीव निधी मंजूर केला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्यासाठी लागणारे पाणी २७ गावांना कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणीसाठा क्षमता १३३ दशलक्ष घनमीटरने वाढणार आहे. धरणाचे काम पावसाळ्यापर्यंत मार्गी लावण्याचे आदेश एमआयडीसीला सरकारने दिले आहेत. तत्पूर्वी, वाढीव पाण्याचे आरक्षण आधीच केलेले आहे.केडीएमसीची १५० दशलक्ष लीटर क्षमतेची पाणीयोजना आहे. महापालिका पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून नाही; मात्र ती २७ गावांसाठी योजना राबवत असल्यामुळे त्यासाठी पाणी कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बारवी धरणातील वाढीव पाण्यापैकी केडीएमसीला २५ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. एमआयडीसीला ८७ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. उर्वरित पाणी स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले जाणार आहे. २७ गावांना महापालिका आपल्या वाट्याचे वाढीव पाणी की एमआयडीसी, हे अद्याप स्पष्ट नाही. महापालिक ा वाढीव पाणी शहरी भागासाठी देणार आहे. एमआयडीसीला जास्त पाणीसाठा मिळाल्याने त्यांनी हे पाणी द्यावे, अशी मागणी २७ गावांनी केली आहे.महापालिकेला प्रत्यक्षात वाढीव पाणी मिळणार का?महापालिकेस मंजूर कोटा २३४ दशलक्ष लीटर असून वाढीव पाणी २५ दशलक्ष लीटर मिळणार आहे. महापालिका यापूर्वीच्या मंजूर कोट्याऐवजी जास्तीचे पाणी उचलते. जास्तीचे पाणी उचलत असल्याने वाढीव पाणीकोट्यात समायोजित केले जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Waterपाणी