शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांसाठी पाणी येणार कुठून? योजना मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:11 IST

केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, या गावांसाठी अद्याप पाण्याचा कोटाच आरक्षित नसल्याने ही योजना कार्यान्वित होऊ न बिनकामाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या एमआयडीसीकडून या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. कारण, योजनेसाठी आवश्यक पाणी येणार कुठून, हेच अद्याप गुलदस्त्यात असल्याने २७ गावांचा पाणीप्रश्न अधांतरीच राहण्याची शक्यता आहे.पालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी २७ गावांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे होती. या गावांना एमआयडीसीमार्फत दररोज ३० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. या ठिकाणी एकाच जलवाहिनीतून अनेक जोडण्या दिल्या गेल्यामुळे २७ गावांतील पाणीवितरण व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना पाणीटंचाईला तोंड जावे लागत आहे. या गावांची एमआयडीसीकडे थकबाकीही होती. ही गावे पालिकेत आल्यानंतर अमृत योजनेंतर्गत २७ गावांच्या पाणीवितरण व्यवस्थेसाठी १८० कोटींची योजना मंजूर झाली. वर्षभरात केवळ योजनेच्या निविदेवर काम अडून राहिले होते. आता पाचव्या वेळेस निविदा काढली जाणार असून सरकारने या योजनेसाठी १३ कोटींचा वाढीव निधी मंजूर केला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्यासाठी लागणारे पाणी २७ गावांना कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणीसाठा क्षमता १३३ दशलक्ष घनमीटरने वाढणार आहे. धरणाचे काम पावसाळ्यापर्यंत मार्गी लावण्याचे आदेश एमआयडीसीला सरकारने दिले आहेत. तत्पूर्वी, वाढीव पाण्याचे आरक्षण आधीच केलेले आहे.केडीएमसीची १५० दशलक्ष लीटर क्षमतेची पाणीयोजना आहे. महापालिका पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून नाही; मात्र ती २७ गावांसाठी योजना राबवत असल्यामुळे त्यासाठी पाणी कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बारवी धरणातील वाढीव पाण्यापैकी केडीएमसीला २५ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. एमआयडीसीला ८७ दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. उर्वरित पाणी स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले जाणार आहे. २७ गावांना महापालिका आपल्या वाट्याचे वाढीव पाणी की एमआयडीसी, हे अद्याप स्पष्ट नाही. महापालिक ा वाढीव पाणी शहरी भागासाठी देणार आहे. एमआयडीसीला जास्त पाणीसाठा मिळाल्याने त्यांनी हे पाणी द्यावे, अशी मागणी २७ गावांनी केली आहे.महापालिकेला प्रत्यक्षात वाढीव पाणी मिळणार का?महापालिकेस मंजूर कोटा २३४ दशलक्ष लीटर असून वाढीव पाणी २५ दशलक्ष लीटर मिळणार आहे. महापालिका यापूर्वीच्या मंजूर कोट्याऐवजी जास्तीचे पाणी उचलते. जास्तीचे पाणी उचलत असल्याने वाढीव पाणीकोट्यात समायोजित केले जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Waterपाणी