शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 12:33 IST

सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.

-  सुरेश लोखंडे

ठाणे : मच्छीमारीसाठीठाणे- पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या असता आतापर्यंत ५६१ बोटीं बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र अध्याप २५६ बोटी अजून किनार्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील 'तौकते' चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ७८ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरातील १८७ बोटी समुद्रातून आलेल्या नसल्याने चिंता वाढली आहे.  ठाणेच्या उत्तन बदरातून ३०५ बोटी समुद्रात गेलेल्या असता २२७ परत आलेल्या आहेत. सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.

अरबी समुद्रातील 'तौत्के' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्यासाठी सतर्क दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील किनार पट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्र  ‌व मदत कार्य कक्ष सतर्क आहे. 

मनुष्यबळ, आवश्यक साधन सामुग्री तयार ठेवण्यासाठी तजवीस ठाणे, पालघरमध्ये होत आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली जात आहे. आजपासून १७ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर चक्रीवादळ  गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यास फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनार्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमार्यांना आवाहन करण्यात येत आहे.      

मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ७८ बोटींची वाट पाहिली जात आहे. पालघरघ्या डहाणू बंदरातून गेलेल्या ७७ बोटींपैकी ७१ बंदरात आल्या आहेत. उर्वरित सहा बोटी समुद्रात आहे.सातपाटी बंदराच्या ३४ पैकी केवळ आठ बोटी परतल्या आहेत. तब्बल २६ बोटी समुद्रात आहे. याशिवाय वसई बदरातून ४०१ बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या आहेत.यातून २५५ बोटी बंदरात आल्या आहेत. उर्वरित १४६ बोटी समुद्रात आहेत.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळमहाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौत्के चक्रीवादळाने आता मोठ्या प्रमाणात वेग पकडल्याची माहिती हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळthaneठाणेFishermanमच्छीमार