शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 12:33 IST

सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.

-  सुरेश लोखंडे

ठाणे : मच्छीमारीसाठीठाणे- पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या असता आतापर्यंत ५६१ बोटीं बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र अध्याप २५६ बोटी अजून किनार्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील 'तौकते' चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ७८ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरातील १८७ बोटी समुद्रातून आलेल्या नसल्याने चिंता वाढली आहे.  ठाणेच्या उत्तन बदरातून ३०५ बोटी समुद्रात गेलेल्या असता २२७ परत आलेल्या आहेत. सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे.

अरबी समुद्रातील 'तौत्के' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्यासाठी सतर्क दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील किनार पट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्र  ‌व मदत कार्य कक्ष सतर्क आहे. 

मनुष्यबळ, आवश्यक साधन सामुग्री तयार ठेवण्यासाठी तजवीस ठाणे, पालघरमध्ये होत आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली जात आहे. आजपासून १७ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर चक्रीवादळ  गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यास फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनार्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमार्यांना आवाहन करण्यात येत आहे.      

मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ७८ बोटींची वाट पाहिली जात आहे. पालघरघ्या डहाणू बंदरातून गेलेल्या ७७ बोटींपैकी ७१ बंदरात आल्या आहेत. उर्वरित सहा बोटी समुद्रात आहे.सातपाटी बंदराच्या ३४ पैकी केवळ आठ बोटी परतल्या आहेत. तब्बल २६ बोटी समुद्रात आहे. याशिवाय वसई बदरातून ४०१ बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या आहेत.यातून २५५ बोटी बंदरात आल्या आहेत. उर्वरित १४६ बोटी समुद्रात आहेत.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळमहाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौत्के चक्रीवादळाने आता मोठ्या प्रमाणात वेग पकडल्याची माहिती हवामान खात्यानं सांगितली आहे. तसेच हे चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळthaneठाणेFishermanमच्छीमार