शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

२५००० बोगस रिक्षा बुलडोझरखाली चिरडा; कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ झाला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:19 AM

ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.

ठाणे : ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.सध्या सुरू असलेल्या रिक्षा परमिटवाटपामुळे जो तो रिक्षामालक होऊ पाहत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची फळीच संपुष्टात आली आहे. त्यातच, परमिट घेण्यासाठी रिक्षावाल्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने भविष्यात कर्जबाजारी होऊन त्यांच्यावरही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येईल. त्यामुळे लोकसंख्या लक्षात घेऊन परमिटचे वाटप करावे, असे त्यांनी सुचवले.ओला आणि उबेर यांच्यामुळे रिक्षावाल्यांचे नुकसान झाले आहे, असे सांगत पेणकर यांनी त्या कंपन्या बेकायदा खाजगी प्रवासी वाहतूक करत आहेत. तसेच त्यांना कोणतेही कायदे, नियमांचे बंधन नाही. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे आणि मगच परवानगी द्यावी, अशी मागणी केली. काल रिक्षा बॅज घेतलेल्या आणि वास्तव्याचा दाखला नसलेल्यांनाही रिक्षा परमिट मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. बॅज मिळाल्यानंतर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर परमिटचे वाटप करावे तसेच रिक्षा आणल्यावर ते द्यावे, अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सीचे १० टक्के क्लेम (इन्शुरन्स) विमा पॉलिसी कंपनी यांच्याक डे होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, राज्य परिवहनमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा क रणार आहोत. तरीसुद्धा त्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला.अडचणींवर झाली चर्चाठाणे जिल्हा कोकण विभाग आणि एमएमआरडीए क्षेत्रातील आॅटो रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध अडचणी- समस्या, शासनाने रिक्षा, टॅक्सी मुक्त (खुले) केलेले परवाने बंद करावेत किंवा ५ ते १० वर्षांपर्यंत स्थगिती द्यावी, यासंदर्भात ठाण्यात रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा हा मेळावा झाला.न जुमानणारी पिढीरिक्षा चालवण्याच्या व्यवसायात येणे सोपे असल्याने दररोज ५० ते १०० जण त्यात उतरत असल्याने एकीकडे त्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये १६ ते १७ वर्षीय मुलांचाही समावेश आहे. पण ही मंडळी कोणत्याही युिनयनला जुमानत नाही. नियम पाळत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे