शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

 शाई धरणग्रस्त आंदोलक अखेर निर्दोष; २५ आंदोलकांची मुक्तता

By सुरेश लोखंडे | Updated: March 24, 2023 18:31 IST

शाई धरणग्रस्त २५ आंदाेलकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 

ठाणे: ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या शाई धरणाच्या भूसंपादनाला आंदाेलनाद्वारे विराेध करण्यात आला हाेता. त्यातील तब्बल २५ गावकऱ्यांवर गुन्हे दाखल हाेऊन कारवाई झाली हाेती. याविराेधात न्यायालयात धाव घेतली असता अखेर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी या २५ आंदाेलकांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे या शाई नदीच्या काठावरील गावकऱ्यांमध्ये आनंदाेत्सव व्यक्त करण्यात येत आहे, असे या आंदाेलनाचे नेतृत्व करणारे पांडुरंग वारघडे यांनी लाेकमतला सांगितले.

ठाणे शहराची भविष्यातील तहान भागवणाऱ्या शाई धरणासाठी जागेचे भूसंपादन न करता सरकारने एफ.ए.कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याआधीच काम करण्याची परवावनगी दिली हाेती. शेतकऱ्यांचे पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही बाबीचा विचार न करता थेट काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांनी विराेध केला हाेताे. या आंदाेलक शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून ठेकेदाराने २५ आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आराेप केला जात आहे.  गेल्या ४ वर्षांपासून हे प्रकरण कल्याण सत्र न्यायालयात सुरू होते.अखेर १२ वर्षानंतर २५ आंदोलकांची पुरेशा पुराव्या अभावी कल्याण न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचे वारघडे यांच्यासह आंदोलनकर्ते बबन हरणे यांनी सांगितले. 

या खटल्यासाठी ॲड चंद्रावती सरखोत व ॲड. मंगेश देशमुख यांनी विनामोबदला या सर्व आंदोलकांची विशेष बाजू मांडली. यामुळे आंदाेलनकर्ते प्रशांत सरखोत, पांडुरंग वारघडे, उमेश वारघडे, बबन हरणे, बेबी वारघडे, अशोक देशमुख, चंद्रकांत वारघडे, देऊ शिंगोळे, अनंता वारघडे, बाळु भंडारी, संतोष वारघडे, सचिन भोईर, शिवाजी भोईर, पांडुरंग भोईर, विनायक भोईर, किसन भोईर, बारकु भोईर, पंढरीनाथ कारभोल, रमेश मुरेकर, महेंद्र रांजणे, नामदेव रांजणे, यशवंत मुरेकार, विशाल देशमुख, ज्ञानेश्वर तिवार, संदीप भंडारी या २५ जणांची मुक्तता झाली आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका