शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

२३५ गावांना टँकरने पाणी; शहरात वाढीव पाणीकपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:44 AM

पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला.

ठाणे : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातून टँकरची मागणी झाल्यास ती जलदगती पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील शहरी भागांत नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पाणीकपातीत वाढ होणार नसल्याचे बुधवारी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. त्याचबरोबर येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.पाणीटंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांची माहितीही घेतली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३५ गावे आणि पाड्यांसाठी ३६ टॅँकर सुरू आहेत. त्यामध्ये शहापूर तालुक्यात २९ तर मुरबाड तालुक्यात ७ टॅँकरचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाण्याची पातळी १२० फुटांच्याही खाली गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुनर्भरण करण्याची गरज असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी ज्या गावातून अथवा पाड्यातून टँकरची मागणी येईल, ती गावे व पाड्यांची तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी तत्काळ पाहाणी करून प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात यावा अशा सूचना केल्या.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेलांना मंजुरी दिली आहे. विंधन विहीरी, नवीन नळपाणीयोजना आठवडाभरात सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर जे भाग उंचावर आहेत, त्या ठिकाणी मोठे टँकर जाऊ शकत नसतील तर तेथे छोटे टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी अधिकाºयांना सांगितले.शहरी भागात तूर्तास मुबलक पाणी : जलसंपदा व एमआयडीसीकडून जिल्ह्यातील पाण्याची स्थिती जिल्हाधिकाºयांनी जाणून घेतली. त्यानुसार, शहरी भागातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिकांना १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू केलेल्या पाणीकपातीत वाढ करण्यात येणार नाही. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे