शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

आधारकार्डांचे २३५ युनिट बंद, जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल, सर्व केंद्रे तत्काळ सुरू करण्याचे दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:17 IST

ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेऊन सर्वच्या सर्व केंद्र तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी महाआॅनलाइनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले.आधारकार्ड नोंदणीसंदर्भातील समस्या व त्याचा गैरफायदा घेऊन ठिकठिकाणी नागरिकांची होत असलेली लूट याबाबत ‘लोकमत’ने ‘ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर आधारकार्डसाठी विनापावती वसुली’ या शीर्षकाचे वृत्त ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. केंद्र सरकारने मोबाइल क्रमांक आधारशी जोडणे अनिवार्य केले असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणकर यांनी जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्र व युनिटचा आढावा घेतला.राज्य शासनाने सीएससी-एसपीव्ही यांच्याकडील सर्व आधारनोंदणी संच शासनाच्याच अखत्यारीतील महाआॅनलाइनला हस्तांतरित केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील २४५ पैकी केवळ १६० आधारनोंदणी केंद्र हस्तांतरित झाले आहेत. त्यातील फक्त १० संच जिल्ह्यात ठिकठिकाणी काम करत असल्याचे निदर्शनात येताच त्यांनी गंभीर दाखल घेतली असून तातडीने सर्व संच सुरू करावेत, असे माहिती तंत्रज्ञान विभागाला कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या कार्यालयातील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती महाआॅनलाइनने केली असता त्यानुसार ठिकठिकाणच्या जागादेखील उपलब्ध केल्या आहेत. मात्र, आधार केंद्रे कार्यान्वित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे आधारकार्डासाठी होणारी पैशांची वसुली थांबेल, अशी आशा आहे.दरम्यान, नागरिकांची आधार अपडेशनबाबत गैरसोय होऊ नये, म्हणून ठाणे येथील मुख्य टपाल कार्यालय तसेच उपटपाल कार्यालय, दमाणी इस्टेट, हरी निवास सर्कल, नौपाडा, तर कल्याण येथील मुख्य टपाल कार्यालय, टिळक चौक, कल्याण रेल्वेस्टेशनजवळील उपटपाल कार्यालय, उपटपाल कार्यालय, प्लॉट क्र . १४, दत्त मंदिराजवळ, सेक्टर १७, ऐरोली या ठिकाणी अपडेशनची सुविधा देण्यात आली आहे.

सुधारित आज्ञावली वापरावीआधार माहिती अद्ययावत करण्यासाठी सध्या ECMP Client ही आज्ञावली वापरण्यात येते. मात्र, त्यामुळे अपडेशनसाठी १५ दिवसांचा विलंब लागतो. मोबाइल अपडेशन जलदगतीने व्हावे, म्हणून यूआयडीएआयने Update Client Lite हे व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे. परंतु, या नव्या आज्ञावलीचा वापर होत नाही. त्यामुळे तो करावा, असे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाने महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयक यांना दिले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड