शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

आधारकार्डांचे २३५ युनिट बंद, जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल, सर्व केंद्रे तत्काळ सुरू करण्याचे दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:17 IST

ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेऊन सर्वच्या सर्व केंद्र तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी महाआॅनलाइनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले.आधारकार्ड नोंदणीसंदर्भातील समस्या व त्याचा गैरफायदा घेऊन ठिकठिकाणी नागरिकांची होत असलेली लूट याबाबत ‘लोकमत’ने ‘ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर आधारकार्डसाठी विनापावती वसुली’ या शीर्षकाचे वृत्त ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. केंद्र सरकारने मोबाइल क्रमांक आधारशी जोडणे अनिवार्य केले असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणकर यांनी जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्र व युनिटचा आढावा घेतला.राज्य शासनाने सीएससी-एसपीव्ही यांच्याकडील सर्व आधारनोंदणी संच शासनाच्याच अखत्यारीतील महाआॅनलाइनला हस्तांतरित केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील २४५ पैकी केवळ १६० आधारनोंदणी केंद्र हस्तांतरित झाले आहेत. त्यातील फक्त १० संच जिल्ह्यात ठिकठिकाणी काम करत असल्याचे निदर्शनात येताच त्यांनी गंभीर दाखल घेतली असून तातडीने सर्व संच सुरू करावेत, असे माहिती तंत्रज्ञान विभागाला कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या कार्यालयातील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती महाआॅनलाइनने केली असता त्यानुसार ठिकठिकाणच्या जागादेखील उपलब्ध केल्या आहेत. मात्र, आधार केंद्रे कार्यान्वित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे आधारकार्डासाठी होणारी पैशांची वसुली थांबेल, अशी आशा आहे.दरम्यान, नागरिकांची आधार अपडेशनबाबत गैरसोय होऊ नये, म्हणून ठाणे येथील मुख्य टपाल कार्यालय तसेच उपटपाल कार्यालय, दमाणी इस्टेट, हरी निवास सर्कल, नौपाडा, तर कल्याण येथील मुख्य टपाल कार्यालय, टिळक चौक, कल्याण रेल्वेस्टेशनजवळील उपटपाल कार्यालय, उपटपाल कार्यालय, प्लॉट क्र . १४, दत्त मंदिराजवळ, सेक्टर १७, ऐरोली या ठिकाणी अपडेशनची सुविधा देण्यात आली आहे.

सुधारित आज्ञावली वापरावीआधार माहिती अद्ययावत करण्यासाठी सध्या ECMP Client ही आज्ञावली वापरण्यात येते. मात्र, त्यामुळे अपडेशनसाठी १५ दिवसांचा विलंब लागतो. मोबाइल अपडेशन जलदगतीने व्हावे, म्हणून यूआयडीएआयने Update Client Lite हे व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे. परंतु, या नव्या आज्ञावलीचा वापर होत नाही. त्यामुळे तो करावा, असे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाने महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयक यांना दिले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड