शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्डांचे २३५ युनिट बंद, जिल्हाधिका-यांकडून गंभीर दखल, सर्व केंद्रे तत्काळ सुरू करण्याचे दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:17 IST

ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील २३५ आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यातील केवळ १० नोंदणी केंद्र सुरू असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेऊन सर्वच्या सर्व केंद्र तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी महाआॅनलाइनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले.आधारकार्ड नोंदणीसंदर्भातील समस्या व त्याचा गैरफायदा घेऊन ठिकठिकाणी नागरिकांची होत असलेली लूट याबाबत ‘लोकमत’ने ‘ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर आधारकार्डसाठी विनापावती वसुली’ या शीर्षकाचे वृत्त ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. केंद्र सरकारने मोबाइल क्रमांक आधारशी जोडणे अनिवार्य केले असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणकर यांनी जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्र व युनिटचा आढावा घेतला.राज्य शासनाने सीएससी-एसपीव्ही यांच्याकडील सर्व आधारनोंदणी संच शासनाच्याच अखत्यारीतील महाआॅनलाइनला हस्तांतरित केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील २४५ पैकी केवळ १६० आधारनोंदणी केंद्र हस्तांतरित झाले आहेत. त्यातील फक्त १० संच जिल्ह्यात ठिकठिकाणी काम करत असल्याचे निदर्शनात येताच त्यांनी गंभीर दाखल घेतली असून तातडीने सर्व संच सुरू करावेत, असे माहिती तंत्रज्ञान विभागाला कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्या कार्यालयातील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती महाआॅनलाइनने केली असता त्यानुसार ठिकठिकाणच्या जागादेखील उपलब्ध केल्या आहेत. मात्र, आधार केंद्रे कार्यान्वित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे आधारकार्डासाठी होणारी पैशांची वसुली थांबेल, अशी आशा आहे.दरम्यान, नागरिकांची आधार अपडेशनबाबत गैरसोय होऊ नये, म्हणून ठाणे येथील मुख्य टपाल कार्यालय तसेच उपटपाल कार्यालय, दमाणी इस्टेट, हरी निवास सर्कल, नौपाडा, तर कल्याण येथील मुख्य टपाल कार्यालय, टिळक चौक, कल्याण रेल्वेस्टेशनजवळील उपटपाल कार्यालय, उपटपाल कार्यालय, प्लॉट क्र . १४, दत्त मंदिराजवळ, सेक्टर १७, ऐरोली या ठिकाणी अपडेशनची सुविधा देण्यात आली आहे.

सुधारित आज्ञावली वापरावीआधार माहिती अद्ययावत करण्यासाठी सध्या ECMP Client ही आज्ञावली वापरण्यात येते. मात्र, त्यामुळे अपडेशनसाठी १५ दिवसांचा विलंब लागतो. मोबाइल अपडेशन जलदगतीने व्हावे, म्हणून यूआयडीएआयने Update Client Lite हे व्हर्जन उपलब्ध करून दिले आहे. परंतु, या नव्या आज्ञावलीचा वापर होत नाही. त्यामुळे तो करावा, असे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाने महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयक यांना दिले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड