शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

ठाण्यात २२ टक्के पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:52 IST

मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे.

ठाणे : मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे. यासाठी २१ आॅक्टोबरपासून आठवड्यातून एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.लघुपाटबंधारे विभागाने गुरुवारी पाण्याच्या स्थितीबाबत बैठक घेऊन आठवड्यात २२ टक्के पाणी कपातीचे फर्मान जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी आणि टेमघर या पाणी उचलणाºया संस्थांना काढले. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवण्याची गरज लक्षात घेऊन २२ टक्के पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आला.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल एक महिना आधी पाणी कपात लागू करावी लागली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून १४ टक्के कपात लागू केली होती. फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली. त्यानंतर तीही रद्द केली होती; पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघुपाटबंधारे विभागाने कपात लवकर सुरू केली. बैठकीतील निर्णयानुसार एमआयडीसी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. महापालिका त्यांच्या सोयीच्या दिवशी कपात लागू करण्याचा निर्णय घेणार आहे.सणांच्या काळात पाणी कपात टाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि एमआयडीसींना पाणीपुरवठा करणाºया आंध्रात सुमारे ३२४ दशलक्ष घनमीटर तर बारवीत २२४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यास अनुसरून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. कुणीही जादा पाणी उचणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबीदेखील या बैठकीत लघुपाटबंधारे विभागाने दिली.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे