शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

ठाण्यात २२ टक्के पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:52 IST

मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे.

ठाणे : मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे. यासाठी २१ आॅक्टोबरपासून आठवड्यातून एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.लघुपाटबंधारे विभागाने गुरुवारी पाण्याच्या स्थितीबाबत बैठक घेऊन आठवड्यात २२ टक्के पाणी कपातीचे फर्मान जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी आणि टेमघर या पाणी उचलणाºया संस्थांना काढले. १५ जुलैपर्यंत पाणी पुरवण्याची गरज लक्षात घेऊन २२ टक्के पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आला.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल एक महिना आधी पाणी कपात लागू करावी लागली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून १४ टक्के कपात लागू केली होती. फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली. त्यानंतर तीही रद्द केली होती; पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघुपाटबंधारे विभागाने कपात लवकर सुरू केली. बैठकीतील निर्णयानुसार एमआयडीसी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. महापालिका त्यांच्या सोयीच्या दिवशी कपात लागू करण्याचा निर्णय घेणार आहे.सणांच्या काळात पाणी कपात टाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि एमआयडीसींना पाणीपुरवठा करणाºया आंध्रात सुमारे ३२४ दशलक्ष घनमीटर तर बारवीत २२४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यास अनुसरून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. कुणीही जादा पाणी उचणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबीदेखील या बैठकीत लघुपाटबंधारे विभागाने दिली.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे